विवाहितेचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ

 विवाहितेचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ



कौटुंबिक कलह सुरू असल्याने २६ नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता झालेल्या (२५) वर्षीय विवाहितेचा मृतदेह बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांच्या घराजवळील स्वतःच्या मालकीच्या विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोमल श्रीकांत राऊत वय वर्ष २५ असे त्या महिलेचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील साबलखेड माहेर असलेल्या कोमल हिचा काही वर्षापुर्वी धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीचे काही वर्ष सुखी संसार सुरू होता. पण  २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान सगळे झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्याबाबत नोंद पती श्रीकांत कल्याण राऊत यांनी २७ नोव्हेंबर रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती.२९ नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी स्वःताच्या विहीरीत महिलेचा मृतदेह  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, संतोष क्षीरसागर, लुईस पवार, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, अमोल ढवळे हे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे.
कोमलने आत्महत्या केली नसून तिचा सासरच्यांनी छळ करून हत्या केल्याचा आरोप मयताच्या आईने केला असून मयतचे पती श्रीकांत कल्याण राऊत, सासरा कल्याण विठ्ठल राऊत, सासू आशाबाई कल्याण राऊत, दिर निलेश कल्याण राऊत या चौघांवर अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरील चार पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सासू आशाबाई राऊत माञ फरार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्ष रवि देशमाने यांनी दिली आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.