वाहनचालक व नागरिकांना कळकळीचे आवाहन.

 वाहनचालक व नागरिकांना कळकळीचे आवाहन.




-------------------

कडा/ प्रतिनिधी.


आष्टी तालुक्यात कडा परिसरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे नगर-बीड रोडवरील शेरी (बुद्रुक) येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने पाणी ओसरुस्तर पोलिस प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आष्टीकडून नगरकडे जाणारी वाहने शिराळ मार्गे नगरला. तर नगरकडून कडा आष्टीकडे जाणारी वाहने केरुळ मार्गे आष्टीकडे तात्पूरती वळविण्यात आली होती. परंतू केरुळच्या नदीला पण पाणी आले असल्यामुळे तो रस्ताही वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पाऊस असल्याने कुठलीही रिस्क न घेता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

*- संतोष खेतमाळस,* 

*पोलिस निरिक्षक आष्टी*

------------------------






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.