ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत- अॅड. भाऊसाहेब लटपटे

 ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत- अॅड. भाऊसाहेब लटपटे



कडा/ प्रतिनिधी ...आष्टी तालुक्यामधील काही ठिकाणी  ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून आष्टी डोईठाण रोडवरील पूल वाहून जाऊन सुमारे पन्नास गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये अनेक जनावरे वाहून जाऊन व वीजपडून दगावले असून जमिनी देखील खरडून गेल्या आहेत या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. भाऊसाहेब लटपटे यांनी जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आष्टी तालुक्यातील धामणगाव कडा या मंडळासह काही गावात पावसाने रुद्र रूप धारण करून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून आष्टी- डोईठाण वरील पूल देखील वाहून गेला आहे तसेच कडा कुसळंब रोड वरील पुलावरुण पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे . बावी 'गावातील शेतकर्यांचे विठोबाची पटी हा ओढा पार करत तीन म्हशी पुरात वाहून गेल्या ग्रामस्थांनी ही जनावरे वाहून गेल्याचे मोबाईल मध्ये चित्रण केले. काही शेळ्या देखील वीजपडून दगावल्याची माहिती आहे . 

बावी कनसेवाडी हा डांबरी रस्त्याला नदीचे स्वरूप येऊन चारच महिन्यांपूर्वी केलेला डांबरी रस्ता देखील वाहून गेला असून सांगवी येथील पुलावरून देखील पाणी ओसंडून वाहत होते . अगोदरच पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांचे पिके करपून जाऊन नुकसान झाले होते. त्यात पुन्हा अतिवृष्टी येऊन जमिनीचे नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ मदत होण्याच्या दृष्टीने पंचनामे करावेत अशी मागणी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे चे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ मुंडे यांची भेट घेणार आहेत .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.