बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण होण्यासाठी..
आ.सुरेश धस यांचे ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन..
आष्टी (प्रतिनिधी ) बीड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण होण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कडे या पाणीपुरवठा योजना कामातील अडचणी दूर करून पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करून पूर्ण करण्यात यावीत याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला आदेश देण्यात यावेत असे निवेदन आ.सुरेश धस यांनी दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की,
बीड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या ई-निविदा सूचना,आणि निविदा प्रक्रिया या प्रकरणी तक्रारी झाल्यानंतर या चौकशी समितीने दिलेल्या अहवालातील आक्षेपां बाबत बीड जिल्हा परिषदेने खुलासा सादर केलेला केलेला असून त्या अनुषंगाने शासनाने ३१ जानेवारी २०२३ रोजी सूचना केलेल्या असून कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नव्याने मार्गदर्शनाची मागणी केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली असून संबंधित ठेकेदार अडचणीत आलेले आहेत..याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशी समितीच्या अहवालावर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद स्तरावरील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात प्रशासकीय कार्यवाही केली असून.. अजूनही कार्यवाही चालू आहे
बीड जिल्हा परिषदेने ई- निविदा ठेकेदारांमार्फत हाती घेतलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांची देखरेख शासनमान्य व्यापकॉस कंपनी लि. आणि तांत्रिक तपासणी टाटा कन्सल्टन्सी इंजिनिअरिंग मार्फत प्रगती पथावरील कामाच्या ठेकेदारांकडून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामे सुरू असून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामांना भेटी देऊन पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यात आलेली आहेत तथापि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची इतर ठिकाणी बदली झाल्याने सध्याचे कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ३१/जानेवारी/२०२३ रोजीच्या शासन निर्देश पत्राचे अवलोकन न करता पुन्हा नव्याने २९ ऑगस्ट २०२३ रोजी सदर चौकशी प्रकरणी मार्गदर्शन मागवल्यामुळे जिल्हा परिषदेच्या योजनांच्या देयकासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधी खर्च न झाल्याने सदरील निधी इतरत्र वर्ग झाल्याचे समजते त्यामुळे कार्यरत ठेकेदारांची देयके अदा न झाल्याने त्यांनी लोकसभा सदस्य खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांच्या बैठकीमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तसेच याप्रकरणी मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्यासमोर एक जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून नव्याने मार्गदर्शन मागवण्यात आल्यामुळे बीड जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनांची प्रगती पथावरील असलेली बहुतांश कामे बंद पडलेले आहेत मात्र केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रम विहीत मुदतीत..मार्च २०२४ अखेर पूर्ण करण्यासाठी संबंधित जि.प.प्रशासन,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला उचित कार्यवाही करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ आदेश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे
stay connected