माझ्या जीवनाच साध्य आणि साधन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर-डॉ. जितीन वंजारे

माझ्या जीवनाच साध्य आणि साधन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर-डॉ. जितीन वंजारे



        माणूस हा समाजशील प्राणी असून तो समाजाशिवाय जगूच शकत नाही,त्याला एकट्याने जीवन जगणं शक्य नाही आणि जरी जगला तरी मरताना त्याला इतरांच्या खांद्यावर स्मशानात जावं लागत म्हणजे माणसाचं सगळ आयुष्य हे इतरांच्या हातात असून त्याला एकोप्यांन,एकीन,समानतेने आणि बंधुभाव व एकात्मता ठेवून जगलं पाहिजे.याच मानवी सभ्यतेमध्ये आशिया खंडातील भारत नावाच्या देशात अस्पर्शता माजली होती, समजासमाजात तेढ निर्माण होऊन रंग, रूप आणि कर्मावरून वर्ण भेद निर्माण झाले होते.हीच वर्णवादी, अस्पर्शदावादी,मनुवादी संस्कृती जेंव्हा पासून भारतात लागू झाली तेंव्हापासून खालच्या वर्णतील लोक म्हणजे ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र यापैकी शूद्र हे अस्पर्श होते त्यांना अच्छुत मानलं जात होत याच घटकातील समूहातून अठराव्या शतकात एक महान तेजस्वी  सूर्य जन्माला आला ज्याला शाळेतून प्रवेश नाकारला गेला म्हणून त्याने शाळेच्या बाहेर बसून अभ्यास केला आणि उच्च शिक्षण घेऊन बाहेरच्या देशात मोठमोठ्या विद्यापीठातून वेगवेगळ्या बत्तीस पदव्या घेऊन परत वापस भारतात येऊन याच शूद्र व वैश्य वर्णातील लोकांसाठी आयुष्य समर्पित केलं.त्यांना न्यायाच्या ,समानतेच्या, बंधुतेच्या आणि देश योगदानाच्या काबील बनवलं त्यांना मतदानाचा हक्क देऊन येथील सत्ताधारी बनवलं ,आरक्षण देऊन सोबतीला येण्याची ताकत दिली,त्याचबरोबर अन्न-वस्त्र-निवारा,शिक्षण आरोग्य,न्याय, हक्क-अधिकार आणि कर्तव्याची जाणिव करून देऊन समाजात वेगळं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याच्या हजार संधी निर्माण केल्या.ज्या माणसाला बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं त्या जिद्दी माणसानं जीवनभर अभ्यास करून इतकं ज्ञान प्राप्त केलं की त्यांनी ह्याच मनुवादी विचाराने विळखा घातलेल्या अस्परशतावादी देशाची राज्यघटना लिहून सर्वांना समान न्याय दिला .ह्याच महामानवाच्या एका सहिने हजारो वर्षांची गुलामीचे साखळदंड तडा-तडा तोडली त्या महणामानावाच नाव म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व महामानव क्रांतीसुर्य परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर होय.

           ज्या महामानवाच्या अथक प्रयत्नांनी आमचं जीवन जेकी पशुसमान होत,मुक्या प्राण्यांना पाणी पिता येत होत पण आम्ही माणसं असून आम्हाला पाणी पिण्याची मुभा नव्हती अस अस्पर्शतेन जखडलेले आमचं जीवन ह्याच माणसामुळे  तेजस्वी झालं. त्याच्या एकाच सहिन जीवनात इतका बदल झाला की आम्ही  पशुचे डायरेक्ट येथील आमदार खासदार मंत्री डॉक्टर इंजिनियर आणि मोठमोठे अधिकारी बनलो .गुलामीची जंजीर तोडून आझादीचे सन उत्सव साजरे करू लागलो,न्याय समानता आणि स्पर्शता आम्हाला नशिबी लाभली,शिक्षण हे वाघिणीचे दूध पिऊन वाल्याचा वाल्मीकी झालोत .ज्या समाजाने आम्हाला गुलामीत सडत ठेवलं होत त्यांचे जावई आम्ही झालोत.तीच लोक आमची यथोचित सेवा करू लागली आम्हाला गावागावात जी हिनतेची वागणूक दिली जायची तिची भरपाई म्हणून महामानवाने आरक्षण देऊन मागे पडलेला समाज एका ज्ञानावादी लोकांच्या प्रवाहात आणला .शिक्षणाने मस्तक सुधारली आणि सुधारलेले मस्तक परत बाबासाहेबांशिवाय कोनापुढच नतमस्तक झाली नाहीत.आम्ही देव पाण्यात सोडले धर्म बाजूला सारले बुध्दाचा धम्म म्हणजेच सुखी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टीकोण स्वीकारला महामानवाने दिलेल्या बावीस प्रतिज्ञा बुद्धाने दिलेलं त्रिशरण, पंचशील आणि अष्टांग मार्ग अवलंबित केला आणि जीवनाचं भल केलं.मग इतकं सारे एका महामानवाने आमच्यासाठी केल्यावर त्याच नाव घ्यायला जर एखाद्याला लाज वाटत असली तर त्याच्या इतका असुरी आणि  नालायक मनुष्य अख्या पृथ्वी तालावर दुसरा कोणी नाही.मला तर वाटते आहे ह्या महामानवाच्या उपकार हजार जन्म घेतले आणि त्यांची प्रत्यक्ष सेवा केली तरी संपणार नाहीत.आणि म्हणून या महामानवाच्या केवळ एका सहीने इतकं आमचं आयुष्य बदललं त्या सहीला माझ्या गाडीवर स्वाक्षरी म्हणून छापण म्हणजेच महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली सलामी असेल.

         माझ्या गाडीवर मागच्या बाजूला काचेवर महामांवाची स्वाक्षरी आहे .खरतर हे जीवन वैभव ज्या युगपुरुषामुळे लाभलं त्या महामानव डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या सहीन हे सगळं जीवन आनंदी,परिपूर्ण आणि तेजोमय झाले ती सही गाडीवर छापून भीमा तुझ्या जन्मामुळे .....! अस वाक्य लिहावस वाटलं आणि मी ते केल.महामानवाला हेच खर अभिवादन माझ्या दृष्टीने असेल.कोणी उपकार विसरले कोणी जयभीम बोलायला लाजले कुणाला बाबासाहेब समजलेच नाहीत कोणी गटतटात विभागून राजकीय स्वार्थासाठी बाबासाहेब वापरले पण माझं सगळं जीवनचं बदलून टाकणाऱ्या त्या तेजस्वी सुर्यासमान विश्वरत्ना ला त्रिवार वंदन.....!  *लेखन-मा.सम्राट डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर-९९२२५४१०३०*





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.