शेततलावात पडून नवविवाहित महिलेचा मृत्यू.
टाकळी अमीया येथे घडली दुर्दैवी घटना...
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळी आमिया येथील महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दि . १८ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
घराजवळच असलेल्या शेततला जवळ कामानिमित्त गेल्या असता ही घटना घडली आहे.
वृषाली यांना तलावातुन गावकऱ्यांनी बाहेर काढून कडा येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले असता डॉक्टरांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे नेले असता डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले .
डॉक्टरांनी कडा येथील पोलीस चौकी येथे फोन करून सांगितले की एक महिला तलावात बुडून तिचा मृत्यू झाला आहे तरी दोन पोलीस कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे आले असता त्यांनी त्या मयताचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले.
सौ वृषाली यांचा विवाह २३ जून २०२३ रोजी सागर ससाने यांच्याशी झाला होता परंतु या विवाहाला दोन महीनेही पूर्ण झाले नाही .तोच काळाने घाला घातला.
तसेच या मयताचा पुढील तपास कड्याचे सहाय्यक फौजदार ए.व्ही.काकडे व अंमलदार सचिन गायकवाड सचिन गायकवाड हे करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
stay connected