Bhimrao Dhonde Birthday Special: शैक्षणिक क्रांतीचे जनक भीमराव धोंडे साहेब
“सोपे रस्ते चालायला सोपे असले तरी ते तुम्हाला जिथे जायचे असेल तेथे पोहोचवतीलच असे नाही. म्हणून रोबर्ट फोर्स्त या इंग्लीश कवीच्या मला आवडणाऱ्या चार ओळी तुम्हाला सांगतो, woods are lovely, dark and deep but I have promise to keep, miles to go before I sleep, miles to go before I sleep. या चार ओळी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याही खूपच आवडत्या होत्या. पण याच कवितेच्या पुढील ओळी मला त्याहूनही जास्त आवडतात. त्या बोधप्रद ओळी अशा आहेत , two road divert from the wood , I took one the less travelled by , and that has made all the difference. या वनराजीतून बाहेर जाणारे दोन रस्ते निघाले, त्यापैकी एक कमी मळलेला रस्ता मी निवडला. जे काही आज घडलय ते त्यामधूनच घडले आहे.”
शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. शिक्षण हेच सामाजिक क्रांतीचे साधन आहे.शिक्षण हे मानवी जीवनाच्या विकासाचा पाया आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. शिक्षणामुळे त्याला चांगले काय अन् वाईट काय हे कळते.शिक्षणातुन नितीमुल्ये दिली जातात. शिक्षणातून सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास केला जातो. शिक्षण हे मानवी जीवन सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे. म्हणूनच महात्मा जोतिबा फुले यांनी पहिल्यांदा अस्पृश्यांच्या मुलीसाठी शाळा काढली. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले व त्यांच्यासाठी आरक्षण धोरण लागू केले.संत गाडगे बाबा म्हणतात की,"शिक्षणाशिवाय माणूस निव्वळ दगड आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका! संघटित व्हा! संघर्ष करा! हे सांगितले. ह्या सर्व महापुरुषांनी शिक्षणाला अग्रक्रम देऊन सर्व अस्पृश्यांनी शिक्षण घ्यावे त्यासाठी प्रयत्न केले. खूप परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज देशातली परिस्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. बदलत आहे. कारण त्यांच्या या धोरणामुळेच व त्यांच्या विचारामुळेच आज तळागाळातील दलित, आदिवासी, भटका विमुक्त, इतर मागासवर्गीय व इतर सर्व शिक्षण घेऊन लोकशाहीमुळे आज मोठमोठ्या पदावर विराजमान झालेले दिसतात. कारण या अगोदर या देशात गरीब ,वंचित ,मागासवर्गीय ,स्त्री यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता
फुले ,शाहू , आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव धोंडे साहेबांच्या व्यक्तिमत्व वर पडला ,आणि मग साहेबांनी ठरवलं या आष्टी सारख्या महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त असलेल्या गावात , शाळा सुरू करण्याचा कारण या गावातील मुला,मुलींनी ,दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षणासाठी जावे लागत असे , आणि मग त्यांनी शेतकरी , हा जगाचा पोशिंदा ,समाजाचा कणा , यांना दैवत मानून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने संस्था सुरू करून तालुक्यातील जनतेचा शिक्षणाचा प्रश्न मिटवला, या छोट्याश्या रोट्याने आता एक मोठ्या वटवृक्षात रूपांतर केले आहे ,आष्टी ,पाटोदा ,शिरूर , तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यात दर्जेदार शाळा ,महाविद्यालय सुरू केले आणि या दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांची शिक्षणाची भुख भागवली ,त्यांनी केलेली शैक्षणिक क्रांती संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते ,महाराष्ट्रतील प्रत्येक गावात , य या शैक्षणिक संकुलात तरुण तरुणी नौकरी करतात , या बरोबरच समाजकारण , राजकारण करत असताना गेली 40ते 50 वर्षे महाराष्ट्राच्या प्रत्येक सामाजिक-राजकीय-आर्थिक,शैक्षणिक क्रांतीचे शिलेदार, चळवळीचे केवळ साक्षीदारच नव्हे तर त्या चळवळीत आघाडीचा सहभाग असलेले भीमराव धोंडे हे एक प्रमुख नाव आहे.
शिक्षण हे राष्ट्राने करावयाचे धर्मादाय काम नसून राष्ट्राच्या भवितव्य घडवणे हे मुख्य कार्य आहे.आपल्या राजकीय जीवनात फक्त शेतकऱ्याचे प्रश्न त्यांचा उत्कर्ष ,त्यांचा विकास व्हावा म्हणून, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा, कापूस एकाधिकार खरेदी योजना, पाण्याचे समान वाटप, शेतमालाचा किफायतशीर हमीभाव असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले .तो ‘माणसांतला माणूस’ आहे. सभोवती माणसे नसतील तर त्यांना अस्वस्थ वाटते.”उगवलेला प्रत्येक दिवसाचा सूर्य हा आणि मावलेलाला चंद्र यातील प्रत्येक क्षण शेतकरी ,गोर गरीब वंचित मागासवर्गीय,यांच्या विकासासाठी व्यथित करतात , आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अर्पण केले. अनेक मोर्चा काढले, कलेक्टर ऑफिसला रुमनी मोर्चा काढला. आष्टी ते मुंबई पाय मोर्चाने शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळवून दिले. आष्टी ते दिल्ली ऐतिहासिक पाय मोर्चाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून दिल्या.
अश्या या शैक्षणिक परिस असलेल्या व्यक्तिमत्त्वात जन्म आष्टी तालुक्यातील रुई नालकोल या छोट्याशा खेडेगाव मध्ये 5 ऑगस्ट 1955 रोजी माता गंगाई व पिता आनंदराव उर्फ बाबाजी च्या पोटी झाला. प्राथमिक शिक्षण गावामध्येच पूर्ण माध्यमिक शिक्षण कडा येथे व महाविद्यालयीन शिक्षण नगर येथे पूर्ण साहेबांना बालपणापासूनच कुस्ती कबड्डी खेळाची आवड महाविद्यालय जीवनामध्ये कुस्ती व कबड्डी खेळामध्ये राष्ट्रीय खेळाडू झाले त्यांनी अनेक पारितोषिक तसेच नगर कॉलेज येथे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्या सर्व तरुणांना संघटित केले व नगर कॉलेजचे जीएस झाले.शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर आष्टी तालुक्यामध्ये दुष्काळ पडलेला होता. लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते जनावरांना चारा नाही रेशनवर धान्य मिळत नाही. ही गंभीर समस्या पाहिल्यानंतर साहेबांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढले. लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले, व तिथून पुढे साहेबांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. लोकांच्या व मित्रपरिवाच्या आग्रहास्तव पुढे विधानसभेची निवडणूक लढविली साहेब आमदार झाले. विकासाच्या कामे मतदार संघात आली रस्ते, तलाव, बंधारे, शिक्षण नव्हतं नगर येथे शिक्षणासाठी जावे लागत होते गरीब घरातील मुलेमुली शिक्षण घेऊ शकत नव्हती म्हणून शिक्षण संस्था आणल्या व शैक्षणिक क्रांती केली. अशा थोर नेत्याचा आज जन्मदिन साहेबांना जन्म दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. ...



%20shivshree%20tanaji%20janjere%20final.jpg)




stay connected