शब्दगंध च्या राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेत वैभव रोडी प्रथम तर डॉ शैलजा करोडे द्वितीय

 शब्दगंध च्या राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेत          वैभव रोडी प्रथम तर डॉ शैलजा करोडे द्वितीय




अहमदनगर – “शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेमध्ये ६२ नवोदित कथाकारांनी सहभाग नोंदवला होता, यामध्ये 'झालंर' ,वैभव रोडे, शेवगाव प्रथम , 'असे हि रक्षाबंधन '  डॉ. शैलजा करोडे, नवी मुंबई द्वितीय तर ' ध्येयवेडा ' सुजित फलके, सोयगाव जि. औरंगाबाद,तृतीय यांना  पारितोषीक जाहिर करण्यात येतं आहेत.” अशी माहिती कथालेखन स्पर्धा प्रमुख बबनराव गिरी यांनी दिली. 



           पारितोषिक प्राप्त साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तकं व साहित्य संमेलनात सहभाग मिळणार असून उत्तेजनार्थ पारितोषिके रामकृष्ण आघोर,सोलापूर, सुधीर फडके व पी.एन.डफळ, नगर यांना देण्यात येणार आहेत.पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती खजिनदार भगवान राऊत यांनी दिली.

        स्पर्धेचे परीक्षण शाहिर भारत गाडेकर,सुनील धस व शर्मिला गोसावी यांनी केले.पारितोषीक प्राप्त साहित्यिकांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी, ज्ञानदेव पांडूळे, प्रा.डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.