आई वडिलाची सेवा मनापासुन करा जिवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. --ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील
आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच घराला घरपण असतं त्यामुळं मनापासून आईवडिलांची सेवा करा तुम्हाला काही कमी पडणार नाही. जीवंत आईवडीलाच्या सेवेमूळे तुमच्या जिवनाचे सार्थक होईल असे प्रतिपादन आवाजाचे जादुगार सुप्रसिध्द किर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांनी केले .
येरोळ येथील भालेकर परिवाराने चारधाम याञा पुर्ण झाल्याने माऊंदेचा कार्यक्रमानिमित्त आवाजाचे जादुगार सुप्रसिध्द किर्तनकार हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे किर्तन महोत्सव आयोजीत केले होते . महाराज पुञ व्हावा ऐसा गुंडा त्याचा ञिलोकी झेंडा या अभंगाचे निरूपण करताना म्हणाले की आई-वडील मुलांसाठी पुष्कळ कष्ट सोसतात. मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे यांसाठी ते प्रयत्न करतात; परंतु काही मुले आई-वडिलांना उलट बोलतात. त्यामुळे आई-वडिलांचे मन दुखावले जाते. मुलांच्या उलट बोलण्यामुळे आई-वडील दुखावले गेले, तर ते देवालाच दुखावल्यासारखे होते. मुलांनो, हे टाळण्यासाठी आई-वडिलांशी प्रेमाने वागावे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ रहावे.आपल्या घरातील म्हातारे आई वडील सुखी असतील तरच घराचं घरपण टिकून राहतं .जे कोणी समाजामध्ये आईवडिलांची सेवा मनापासून करतात त्यांना आयुष्यात कुठे काही कमी पडत नाही .त्यामुळे ते गेल्यानंतर दशक्रिया विधी व पुण्यतिथीला खर्च करण्यापेक्षा ते जिवंत असेपर्यंतच त्यांना सुखाने खाऊ घातलं तरच खरं पुण्य मिळतं .प्रत्येक आईवडील स्वत: चंदनाप्रमाणे झिजवून आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी धडपडत असतात .समाजातील अन्य अंधश्रद्धा रूढी परंपरांवर त्यांनी कडाडून टीका केली .नुसता भंपकपणा असून चालत नाही तर माणसांनी कृतीतून ते केलं पाहिजे .मोठ्या मोठ्या समारंभामध्ये आईवडलांचे महती सांगायची आणि घरी आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायचं असं समाजात घडता कामा नये .मी स्वतः माझ्या आईची सेवा मनापासून करतो त्यामुळे मला समाजाला सांगण्याचा अधिकार असे असे ठामपणे त्यांनी किर्तनामध्ये सांगितले .
आईचे महत्त्व सांगत असताना त्यांनी सांगितले की आई गेल्यानंतर लेकीचा माहेराचा आधार तुटतो तिला माहेर सुनंसुनं वाटतं .तसंच समाजामध्ये खरं पाहिलं तर मुलांपेक्षा .मुलीची माया आईवर जास्त असते .म्हणून तुमच्या घरात आनंद टिकवून ठेवायचं असेल आपल्या घरातील आई वडीलच सुखी असले पाहिजेत .आपल्या वृध्द मातापित्यांचा सांभाळ मनापासून करा आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंतच आपल्या घराचं घरपण टिकून राहतं असे सांगितले.
यावेळी गणेश भालेकर व महेश भालेकर परिवारांनी येणार्या भावीक भक्तांना ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मान केला. यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वरिष्ट पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम, सा.पोलीस निरिक्षक प्रविण राठोड, तहसिलदार अतुल जटाळे, माजीकृषी सभापती गोविंद चिलकुरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष मगेंश पाटील, चेअरमन अतुल पाटील गंभीरे, डी.एन.शेळके दादा, गोविंद पोतदार, सरपंच सौ.सुकमार लोकरे उपसरपंच सतिस सिंदाळकर, ओमप्रकाश तांबोळकर यांच्यासा येरोळ व पंचक्रोशीतील भावीक भक्त उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
तेजवार्ता न्युजसाठी बाबूराव बोरोळे शिरूर अनंतपाळ
stay connected