*जातीवादी आतंकी संघटनेला कोण रोखणार?*
जातीय तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई करुन मुस्लिम समाजाला न्याय मिळावा
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अहमदनगर - वेळ असतांना जातीयवादी आतंकवादी संघटनेवर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नसल्याने अहमदनगर मध्ये जातीय तेढ निर्माण झाल्याबाबत व मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवा, या मागणीचे निवेदन एमआयएमच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून काही जातीयवादी आतंकवादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेने अहमदनगर जिल्ह्याचा वातावरण दूषित करून अहमदनगर मध्ये मोठी जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्नात असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. मागील काही महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात धर्म सभाच्या नावावर मुस्लिम द्वेष पसरवण्याचे कार्य चालू आहे. कधी मुस्लिम समाजाच्या महिलांबाबत चुकीचा वक्तव्य करणे, तर कधी मुस्लिम काय खाणार यावर भाष्य करणे, कधी मुस्लिम समाजातील धार्मिक विधी बाबत बोलणे तर कधी मुस्लिम समाजातील व्यक्तीने किती लग्न करावे याबाबत भाष्य करणे. असे अनेक मुस्लीम धर्माविरोधात विष पेरण्याचे काम अहमदनगर जिल्ह्यात काही जातीवादी आतंकी संघटना करत असल्याने प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून दिले होते व आहे.
याबाबत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांना वेळोवेळी तक्रार अर्ज करून कारवाईची मागणी केली होती व आहे. परंतु नेहमी प्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनी आज पर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे दीसुन येत आहे. मुस्लिम समाजाचे दर्गा असो की मशीद असो, मुस्लिम महिला असो की पुरुष सर्वांना हे जातीवादी आतंकी संघटना यांनी लक्ष केले आहे.
कोणताही कारण नसतांना किंवा जाणून बुजून वाद निर्माण करून मुस्लिम समाजावर जीव घेणे हल्ला करणे, मुस्लिम धार्मिक स्थळांची विटंबना करणे, पीर वलींच्या दर्ग्यावर वाद निर्माण करून कब्जा करण्याचा प्रयत्न करणे, मुस्लिम महिलांना उद्देशून पुरुषांना आव्हान करणे, मुस्लिम समजाचा सामूहिक बहिष्कार टाकने व तसे करण्याचा आव्हान करणे , तसेच आपल्या धर्माच्या लोकांना मुस्लिम समाजाच्या व्यक्ती कडून कोणतीच वस्तू खरेदी न करण्याचे आव्हान करणे, मुस्लिम मुलीशी लग्न केल्यास आर्थिक मदत करण्याचा आश्वासन देणे, असे अनेक प्रकारे मुस्लीम समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न या जातीवादी आतंकी संघटना करत आहे.
या अनुषंगाने तक्रार देऊनही कोणती कारवाई पोलीस प्रशासना तर्फे होत नसल्याचे दिसते. या उलट मुस्लीम समाजाला मानसिक शारिक त्रास होऊन प्रशासनातर्फे मुस्लीम समाजाच्या युवकांवर गुन्हा नोंदवण्याचे काम सरास चालू आल्याचे दिसते. कोटला, जे जे गल्ली येथील दोन समाजातील दंगल असो, रामवाडीतील दोन मुलांचा वादात ज्यांचा काहीही संबंध नाही त्यांना फक्त सांगण्यावरून आरोपी करण्यात आले.
नुकतेच गजराजनगर येथील झालेली घटना. मुस्लीम समाजाने स्वतः खरेदी केलेली जाग्यावर पत्र्याचा शेड टाकले व त्या ठिकाणी पाच वेळा नमाज व रमजान महिन्यात तरावी नमाज पठण करण्याचा नियोजन खूप वर्षापासून करण्यात आले आहे. त्या पत्र्याचे शेडमधे इस्लाम धर्मानुसार नमाज होते. म्हणजे ती जागा मशीद आहे. गजराज नगर येथे मशीदीवर हल्ला झाला आणी पोलीस प्रशासनाने नेहमी प्रमाणे 15 -20 मुस्लीम मुलांना अटक करून आरोपी करण्यात कोणतेही विलंब केला नाही. विशेष म्हणजे जो व्यक्ती तिथे राहत नाही त्याला आरोपी करण्यात आले. मुस्लीम व्यतिरिक इतर आरोपींना मशीदीवर हल्ले करूनही साधे कलम लावण्यात आले हे विशेष.
असे अनेक घटना अहमदनगर शहरात व जिल्ह्यात मागील काही महिन्यात घडले आहे. ज्यात पोलीस प्रशासनाने केलेली कारवाईवर प्रश्न निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांना असे दृष्य दिसत आहे की संबंधित जातीवादी आतंकी संघटनेवर कोणतीच कारवाई का होत नाही? या जातीवादी आतंकी संघटनेच्या पदाधिकारी व कार्याकार्तेंना वाचवण्यासाठी किंवा कारवाई न करण्यासाठी प्रशासणावर कोणते दबाव आहे?
असे जर नेहमी घडले तर मुस्लीम समाजाला न्याय मिळून कोण देणार? धर्म सभेच्या नावावर मुस्लीम द्वेष सभा आयोजित करून दंगल घडवण्याचे प्रयत्न करीत असलेल्या जातीवादी आतंकी संघटनेला कोण रोखणार? वारंवार मुस्लीम समाजाच्या धार्मिक स्थळावर तसेच पीर आणि दर्ग्यावर होत असलेले हल्ले याला जबादार जातीवादी आतंकी संघटनेला कोण रोखणार किंवा कोण कारवाई करणार?
सध्या अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती पाहता असे दिसते की येणार्या काळात या जातीवादी आतंकी संघटनेला अहमदनगर मध्ये मोठी जातीय दंगल घडून आणावयाची आहे. या षड्यंत्रला रोखणे खूप गरजेचे आहे.
तरी आपणास विनंती आपण योग्य उपाय योजना करावे आणि मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळून देण्यास आम्हाला मदत करावी तसेच या सर्व घटनेत मागे जी जातीवादी संघटना कार्यरत आहे त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्तेयांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात डॉ.परवेज अशरफी यांनी म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति गृहमंत्री, अल्पसंख्याक आयोग, महाराष्ट्र पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलिस अधीक्षक अहमदनगर, पालकमंत्री अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
---------

stay connected