*शेतकऱ्यांविषयी ची भावना बदलू ,शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करु*
महाराष्ट्रामध्ये सध्या कांदा, कापूस, सोयाबीन, कोबी, भाजीपाला इत्यादी पिकांचे बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी वेगळाच पवित्रा अवलंबिल्याचे दिसते आहे,काही ठिकाणी शेतकरी भर रस्त्यामध्ये ट्रॅक्टर पलटी करून कांदा रस्त्यावर टाकत आहे, काही ठिकाणी मेथीच्या जूड्या अत्यंत कमी भाव असल्यामुळे इतरांना फुकट वाटताना, जनावरांना चारताना शेतकरी दिसत आहे, काही ठिकाणी शेतकरी कापसाला आग लावून जाळवताना दिसत आहे,काही ठिकाणी सोयाबीन रस्त्यावरती फेकून देताना शेतकरी दिसत आहे तर काही ठिकाणी कोबीला अत्यंत कमी भाव आल्यामुळे बाजारपेठांपर्यंत नेण्यासाठी वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याकारणाने शेतकरी उभ्या कोबीच्या पिकामध्ये ट्रॅक्टर रोटर घालताना दिसत आहे अशा पद्धतीने मेहनतीने वाढवलेल्या पिकांवर ट्रॅक्टरचे रोटर मारून पीक नष्ट केली जात आहेत या सर्व घटनांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे दिसून येते की खरोखर शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीमालाला बाजारपेठापर्यंत नेण्यापुरताही बाजारभाव मिळत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट असून यामागे शेतकऱ्याची संतप्त भावना दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी रागाच्या भरात स्वतःच्या पिकाचे नुकसान करत आहे किँवा आत्महत्या करत आहे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणारे याच शेतीप्रधान भारत देशातील पुढाऱ्यांची बुद्धी कांद्याप्रमाने सडली आहे की काय ? असा संतत्प सवाल शेतकरी नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी उभा केला आहे.
एखादया हॉटेल मध्ये जेवल्यावर आपण पगार असणाऱ्या वेटर ला टीप म्हणून काहीना काही पैसे देतो तिथे आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो .आपण पूर्ण बिल भरूनही वरतून आणखी पैसे देतो पण एखादया शेतकऱ्याकडून भाजी घेताना त्याला एक्स्ट्रा पैसे आपण का देत नाहीत?तिथे आपण तोलमाप का करतो ? तिथंही टीप द्यायला आपल्याला का वाटत नाही उलट आपण शेतकऱ्याला कमी पैसे देतो.किमान शेतकऱ्यांची पोरं म्हणून आपण तरी ही संस्कृती राबुयात.मॉल मध्ये खरेदी केल्यावर साधी पिशवी फुकट मिळत नाही तिलाही पैसे मोजावे लागतात मग आपण पिशवीला गप गुमान पैसे देणारे सो कॉल्ड प्रतिष्ठित मानस शेतकऱ्यांकडून माल घेताना तीच भावणा का ठेवत नाहीत ? यावर कोणी आवाज उठवेल की नाही ? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेसाठी हापापणाऱ्या सर्वच नेत्यांनी लाज सोडली आहे की काय ? अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.कारण शेतीच्या मालाच्या हमीभावासाठी कोणीच बोलत नाही. जिथे तिथे शेतकऱ्यांचाच जीव जातोय.खते, बी,बियाणे, कीटक नाशक, औषधी,इलेक्ट्रॉनिक वस्तू ,शेतीचे अवजारे विकणारे लोक कंपन्या शेतकऱ्यांना एकही रुपया कमी करत नाहीत.मग तोच शेतकरी स्वतः पैसे व मेहनत करून कमावलेल्या पिकांना हमीभाव मिळवू शकत नाही त्याच्या मालाचा भाव ठरवणारे लांडगे दुसरे आहेत हे दुर्भाग्य आहे .हा कलंक तुम्ही राजकीय पुढाऱ्यांनी मिटवायला हवा नाहीतर त्याच्या कष्टाचे पापी तुम्ही व्हाल लक्षात असू द्या.शेतकऱ्यांची अन्नधान्य,भाजीपाला, फळ ही योग्य भावात त्यांनी सांगितलेल्या दरात किंवा त्यांना एक्स्टा पैसे देऊन आपण एक वेगळा पायंडा पाडू शकतो. शेतकऱ्यांच्या शेतात कामाला मदत म्हणून जिम मध्ये घाम गाळण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याला आठ दिवसातून एक दिवस मदत म्हणून देऊ शकता . राष्ट्रहीत म्हणून शेतकऱ्यांना मदतीसाठी एखादा राष्ट्रीय दिन पण अमलात आनुयात जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत बिचारे मरणार नाहीत.एका वर्षात
२ हजार शेतकरी आत्महत्या करतात कारण त्यांना मदत करायला,मानसिक पाठबळ द्यायला कोणी नाही . एक गरोदर हत्तीला मारल्याने हळहळ व्यक्त करणारे आपण आपल्यातला एक एक शेतकरी आत्महत्या करताना कसे पाहू शकतो ? आपण इतके असंवेदशील कसे वागू शकतो?राजकीय नेते तर गेंड्याची कातडी पांघरून बसलेत हो पण आपण एक शेतकरीप्रेमी किंवा शेतकरीपूत्र म्हणून शेतकऱ्यांसाठी केंव्हा एकजूट होऊ हाच मोठा प्रश्न आहे .दादा, भैया, अण्णा, तात्या, मामा,काका, साहेब अश्या नेत्यांना उपमा देणारे,त्यांच्या पुढे पुढे करणारे, त्यांची मोफत काम करणारे आणि त्यांचं भूषण वाढवणारे आपले पोरं जेंव्हा शेतातील बापाची आत्महत्या थांबवू तेंव्हाच आपण खरे राष्ट्रभक्त बनू नसता आपल्या पुढच्या पिढ्याही बरबात होतील लक्षात असू द्या. शेतकऱ्यांच्या शेतातून जाताना एखाद खाद्य पीक काढणी चालू असेल तर तो प्रेमळ आणि मोठं मण असणारा उदारमतवादी शेतकरी आपल्या पदरात काहीना काही तरी देतोच .मोकळ्या हाताने जाऊ देत नाही इतक्या सढळ हाताच्या शेतकऱ्याला आपण चींगुस् पणा दाखवतो ही आपल्यातील घान प्रथम आपण दूर केली पाहिजे .
स्वतः राबल्या शिवाय शेती कळत नाही.जोपर्यंत आपण शेती स्वतः कसत नाहीत तोपर्यंत शेतकर्यांचे कष्ट अपल्याला समजणार नाहीत.कापसाला भाव नाही, कांदा सडून चालला आहे त्याला भाव नाही , कोबी फ्लॉवर शेतातच सडून जात आहेत पण योग्य बाजारभाव नाही यामुळे शेतकरी उभ्या पिकाकडे पाहून आत्महत्या करत आहे.हे थांबवण्यासाठी आपण मनातून बदललं पाहिजे छोट छोट्या शेतकऱ्यांचा डायरेक्ट माल आपण खरेदी केला पाहिजे व्यापारीवर्ग टाळला तर शेतकरी मोठा होईल आणि आपल्यालाही कमी दरात चांगला ताजा भाजीपाला माल मिळेल त्यामुळे आपण शेतकरीप्रेमी झाल पाहिजे.ही सुरुवात स्वतःपासून करूयात......
*लेखन सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर -९९२२५४१०३०*
stay connected