भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी जळगाव जिल्ह्याचे नव वर्षानिमित्त १ ले ऑनलाईन काव्यसंमेलन
*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी जळगाव जिल्ह्याचे नव वर्षानिमित्त १ ले ऑनलाईन काव्यसंमेलनाचे मा.जिल्हाध्यक्षा संगीता महाजन आणि मा.उपाध्यक्षा रुपाली मोरे यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा मा. श्वेता देशपांडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले.*
*दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत गुगल मीट वर संपन्न झाले.*
*संमेलन अध्यक्ष स्थानी डाँ. महायोगी प्रेम फालक यांनी कविता ही उत्कृष्ट दर्जेदार करण्यासाठी मार्गदर्शन केले , कवितेला काँपी राईट करावे. कविता ही अंत:करणातून तुमची भावना व्यक्त करणारी असावी . दु:खी वेदना देणा-या नको तर आनंदी प्रसन्न करणा-या कविता हवी . सादरीकरण करतांनी ती समोरच्याला खिळवून ठेवता येईल अशी पाहिजे.काही तरी संदेश देणारी असावी. स्तुतीची अपेक्षा कधी करु नये. प्रेम सरांनी स्वत:चा कीस्सा सांगितला.बालपणी पुरस्कार मिळाल्यावर आजोबा म्हणाले काय लाकडे गोळा करतो. यावरुन सर म्हणाले कविता पुरस्कारासाठी न लिहिता स्वत:ला आनंद देण्यासाठी , जगण्यासाठी लिहावी . अनेकांनी प्रश्न विचारले त्यांची सहज सोपे असे समाधानी उत्तरे सरांनी दिली.*
*समुह अध्यक्षा संगीता महाजन यांनी प्रास्ताविक करतांना शब्दपुष्पांनी सरांचे स्वागत केले.सरांचा परिचय देतांना ते कवी, लेखक, समुपदेशक, रिलेशनशिप कोच, जीवनप्रशिक्षक व प्रेमालय फांउडेशनचे संस्थापक दैवी आदर्श व्यक्तीमत्व असे प्रेम सर यांच्या या " प्रेमालय फांउडेशन" चे १ जानेवारीला दुसरे वर्धापन दिन होते. प्रेमसरांचा उद्देश लोक कल्याणासाठी लोकांच्या हदयात प्रेम जागृत करुन जीवन आनंदाने , प्रेमाने, सुख, समाधाने भरुन जावे, मोक्ष प्राप्तीचा आनंद घ्यावा . विविध विषयावर नेहमी कार्यक्रम विनामुल्य घेतले जाते .यात विदयार्थी, पालक ,वृद्धांना, आध्यात्मिक , निरोगी जीवन, हजारोच्यावर लोकांच्या जीवनामधील अंधार दूर करुन जीवन उज्ज्वल केले. असे अनेक विषय असतात.* *शब्दपुष्पांनी सरांचे आगमन झाले.*
*मा.रुपाली मोरे जळगाव जिल्हा उपाध्यक्षा यांनी मधुर आवाजात स्वागतगीत सादर केले.*
*मा.ज्योती राणे महिलाध्यक्षा व ज्योती वाघ सचिव यांनी सुंदर गोड आवाजात सुत्रसंचालन केले.*
*सर्व कवीवर्यानी सुंदर कविता सादरीकरण केले. त्यानंतर राष्ट्रीय समिती महिलाध्यक्षा व प्रमुख पाहुण्या मा.चैताली कापसे यांनी गोड आवाजात कविता कशी असावी. तिला अर्थ असावा. ती समजली पाहिजे . सादरीकरण नीट करता यायला हवे अनेक सुंदर मुद्दे मांडले.*
*मा.ज्योती वाघ यांनी आभार प्रदर्शन केले.*
*विशेष अतीथी व जळगाव समूह समिती उपस्थिती दर्शवत आनंदाने हसत खेळत संमेलन पार पडले.*
stay connected