श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच ऋतुजा घोलप हिचा सत्कार संपन्न
श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कडा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा घोलप येणे नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मनामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये लेखा अधिकारी वर्ग एक पदी निवड झाली त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री अजिनाथ गाडे सर हे होते या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे, व सत्कारमूर्ती ऋतुजा घोलप उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
ऋतुजा घोलप यांनी मिळवलेल्या उत्तुंग अशाबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अगोदर स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाने प्रेरित होऊन कठोर मेहनत घेऊन संघर्ष केल्यानंतर यश निश्चित मिळते अशी ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. ऋतुजा घोलप यांनी कोणतेही क्लास न लावता वर्ग एक ची परीक्षा पास झाल्या यावरून असे दिसते की आपले ध्येय निश्चित असेल तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थी आदित्य सुंबरे याची याची बिहार येथे आयोजित नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली तसेच राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आदरणीय भीमरावजी मुंडे साहेब, युवा नेतृत्व डॉक्टर अजय धोंडे व अभय धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी बी राऊत श्री शिवदास विधाते श्री दत्तात्रय दिलचे श्री ज्ञानदेव बोडके श्री शेंडे सर कॉलेजचे प्राचार्य श्री गाडे सर उपप्राचार्य श्री गांगडे सर यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गाडे सर यांनीही विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी पैशांची आवश्यकता नसून योग्य मार्गदर्शन आणि तुमची चिकाटी याची आवश्यकता आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री अविनाश भवर सर यांनी केले या कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विद्यार्थिनी साक्षी पगारे, आरती तरटे, मयुरी विटकर, आफरीन सय्यद, वैष्णवी ननवरे, गोरे आकांक्षा यांनी भाषणे केली. श्रीमती झगडे मॅडम यांनीही सावित्रीबाईंनी समाजाची अवहेलना सहन करून श्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला त्यामुळेच आज विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा दत्तात्रय ढवळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे आभार श्रीमती नाईक मॅडम यांनी मांडले. यावेळी कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
stay connected