*जोशिसांगवी ते तेलंगवाडी या रस्त्यावरील पुल तुटल्याने प्रवाशांचे हाल**रिपब्लीकन सेना आंदोलनाच्या पावित्र्यात*
नांदेड (प्रतिनिधी - प्रदिप मगरे ) - लोहा तालुक्यातील जोशिसांगवी ते तेलंगवाडी या रस्त्यावरील पुल तुटल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे .तरी नागरीकांना पुल तुटल्यामुळे पुलावरुन येणे जाणे साठी मोठी कसरत करावी लागते . वाहतुकिला वळुन जावे लागते .
जोशिसांगवी ते उस्माननगर पुलावरुन विद्यार्थ्यांना साईकल व पायी जान्याकरीता त्रास सहन लागतो. पुल तुटल्यामुळे पाच किलो मिटर वळुन जावे लागते . गेल्या दोन वर्षांपासून सतत नागरीकाना त्रास सहन करावा लागतो .आनेक दिवसापासुन संबंधीत अधिकारी व राजकीय पुढार्यांना सांगुन सुद्धा त्या पुलाकडे सर्वांचेच दुर्लक्ष का होत आहे ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे . लोहा तालुक्याला लोकप्रतिनिधी आहेत कि नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे . लोक प्रतिनिधींनी त्वरीत या प्रश्नी लक्ष द्यावे अन्यथा रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करील असा इशारा रिपब्लिकन सेना नांदेड दक्षीण जिल्हाउपाध्यक्ष प्रदीपभाऊ मगरे , विलास मगरे ,बाळु गजभारे , अमोल जाधव , अश्विन गरर्दनमारे सामाजीक कार्यकर्ते यांनी दिला .



stay connected