पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमी इतिहासाची महती आणि माहिती सर्व दूर पोचवण्याची आवश्यकता..

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमी इतिहासाची महती आणि माहिती सर्व दूर पोचवण्याची आवश्यकता.. 

-- आ.सुरेश धस

********************************




******************************

आष्टी (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सोज्वळ आणि सात्विक प्रतिमा संपूर्ण भारत देशभर माहिती आहे, परंतु त्याचबरोबर कणखर नेतृत्व कुशल प्रशासक आणि पराक्रमी तलवार हाती घेऊन लढवय्या भूमिकेतील अहिल्यादेवींची महती आणि माहिती सर्व दूर भागात पोहोचवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती गावोगावी सार्वजनिक स्वरूपात साजरी व्हावी.. असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले

 आष्टी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते

 यावेळी व्यासपीठावर युवा नेते अभिजीत शेंडगे, नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर,प्रकाश सोनसळे, रामहरी महारनवर,रमेश गावढे,अशोक ढवण,मुकेश काळे इ. उपस्थित होते.

 आ.सुरेश धस पुढे म्हणाले की,

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत अल्पवयात राज्यकारभार हाती घेऊन कुशल निर्णय, कठोर भूमिका आणि जनतेच्या हिताचा प्रजा निष्ठ कारभार करून मोठा इतिहास घडवला आहे.. भारत वर्षामध्ये परकीय आक्रमणामुळे हिंदू देवी देवतांच्या मंदिरांवर तोडफोड झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत देशातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे

 अनेक गावातील मंदिर पुनर्निर्माणाचे ऐतिहासिक कार्य अहिल्यादेवी यांनी केले आहे

अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा त्यांच्या हाती महादेवाची पिंड असलेली सात्विक, सोज्वळ ही प्रतिमा संपूर्ण भारत देशभर माहिती आहे परंतु पराक्रमी अहिल्यादेवींची घोड्यावर स्वार होऊन हाती तलवार घेऊन लढवय्या झुंजार सेनानी या भूमिकेतील प्रतिमा जनतेसमोर येण्याची आवश्यकता असून त्यासाठी गावोगावी सार्वजनिक स्वरूपामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करावी असे आवाहन आपण काल केल्यानंतर संपूर्ण आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये गावोगावी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी झाली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीपणाचे उदाहरण सांगताना आ.सुरेश धस यांनी त्यांनी  किल्ल्यांवर जलसंधारणाचे काम त्यांनी केले असून युद्धकालीन परिस्थितीमध्ये पाण्याची टंचाई उद्भवू नये यासाठी त्यांनी मोठे हौद आणि पाण्याचे साठे निर्माण केले.

भारत देशावर परकीय शक्तींनी आक्रमण केले हे परकीय आक्रमक केवळ महाराष्ट्रातील  लढवय्या आणि पराक्रमी असलेल्या शासकांना घाबरत होते असे इतिहासाचे दाखले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळात बॉम्ब गोळे तयार करण्याचा कारखाना उभारला होता त्यांच्याकडे आरमार होते या त्यांच्या दूरदृष्टीपणाची महती आणि माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील साहित्याची पुस्तके मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ग्रामीण भागामध्ये त्याचे वाटप करणार आहोत यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे असे सांगत त्यांनी प्रत्येक राष्ट्रपुरुषाला आपापल्या जाती मध्ये वाटण्याचे काम काही लोक करत आहेत हे चुकीचे असून महाराष्ट्रातील कोणताही राज्यकर्ता हा जातीसाठी न लढता सर्वसामान्यांना घेऊन मराठा म्हणून परक्यांशी लढला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे दूरदृष्टी आणि प्रजादक्ष हितकारभाराचे उदाहरण देताना आ. सुरेश धस यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे लक्ष गोरगरीब शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी लक्ष असे त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या देखील आपल्या घोडदळाकडून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे बारकाईने लक्ष होते 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती यावर्षीपेक्षा पुढील जयंती मोठ्या प्रमाणावर उपक्रमांनी साजरी करू असे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी आष्टी तालुक्यातील धनगर समाजाचे युवा नेते अभिजित शेंडगे बोलताना म्हणाले,पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. या जयंतीचे औचित्यसाधून 300 रुपयाचे नानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोटो चिटकवून खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाच्या गौरव करण्याचे काम केले आहे.याबद्दल देश आणि राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो. अहिल्यादेवी यांनी एका जाती चे काम न करता अठरा पगड जातींन सोबत घेऊन काम केले. त्याचप्रमाणे आ.सुरेश धस यांच्या माध्यमातून संपूर्ण आष्टी मतदारसंघात जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.काही आपल्यातील लोक आ.धस यांना एका जातीच्या देखील घरट्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र त्यांना हे चोख आजच्या जयंती निमित्ताने चोख उत्तर असुन भव्यदिवे शोभा यात्रेचे फोटो पहावेत मग त्यांच्या लक्षात येईल आ.धस हे नेतृत्व कोणत्याही एका जातीय पुरतच मर्यादित नसले नसून अठरा पकड जातींना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे.

प्रास्ताविक ज्ञानेश्वर माऊली जरांगे यांनी केले. पाटोदा तालुक्यातील युवा नेते प्रकाश सोनसळे यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.