आष्टी मतदारसंघात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या - आमदार सुरेश धस
आष्टी (प्रतिनिधी)
अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान झालेल्या भागातही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुषंगाने मराठवाड्यासह आष्टी मतदारसंघात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात पावसाने मे महिन्यातच धुमाकूळ घातला आहे.गेल्या आठ दिवसांत पावसाने आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतक-यांचे नुकसान झाले आहे.दि. 12 मे पासुन सुरू असलेल्या अवकाळी पाऊस (अतिवृष्टी) झाल्यामुळे.. शेतकऱ्यांच्या कांदा, उन्हाळी बाजरी, चाऱ्याची मका इत्यादी हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे...
त्या अनुषंगाने रविवार (दि.२५) रोजी सायंकाळी ६ वा.आमदार सुरेश धस यांनी पावसाचा आढावा घेतला.यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,गेल्या आठ दिवसांपासून आष्टी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.
यामध्ये कांदा,आंबा,डाळींब यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आष्टी, पाटोदा, आणि शिरूर का. या तीनही तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी दोन दिवसांपूर्वी बैठक घेत याबाबत चर्चा झाली होती, त्यानुसार आजपासून कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सुरु झाले आहे..
त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती, संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना देऊन पंचनामे करण्यासाठी सहकार्य करावे.सर्व नुकसानीचा अहवाल दोन दिवसांत देण्याच्या सुचना आमदार सुरेश धस यांनी दिल्या आहेत.
आर.टी.जिजा यांच्या निधनाने एक चांगला मित्र गमावल्याचे शल्य कायम राहील. - आ.सुरेश धस
आर. टी. जिजा यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त हे अत्यंत वेदनादायी असून भाजपचे जिल्हाध्यक्ष ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असा त्यांचा प्रवास होता.अतिशय चांगला माणूस म्हणून त्यांची ओळख होती.सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा,मितभाषी असलेला, मनामध्ये कधीही कुणाविषयी आकस न बाळगणारा आणि कायम कार्यकर्त्यांवर प्रेम करणार व्यक्तिमत्त्व म्हणून आर.टी.जिजा होते.त्यांच्या निधनाने एक चांगला मित्र गमावल्याचे शल्य कायम राहील.
आ.सुरेश धस
आष्टी/पाटोदा/शिरूर(का.)
stay connected