*नाशिकच्या चिमुरडीने केली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद---*
*कु. श्रेयंका श्रेयस कुलकर्णी हिने वयाची अवघी सव्वा चार वर्ष पूर्ण केली आहेत. प्रभु रामरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीतील या मुलीने एवढ्या कमी वयात संस्कृत मधे असणारे 38 श्लोकांचे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र कमीत कमी वेळेत म्हंटल्यामुळे तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद झाली आहे. ही नाशिकसाठी आणि मुंबईसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण तिच्या वडिलांची जन्मभूमी नाशिक आहे तर कर्मभूमी मुंबई आहे. तिच्या यशात तिचे वडील श्रेयस कुलकर्णी व आई सौ. प्रियंका कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे. श्रेयस कुलकर्णी हे रिझर्व बँक ऑफ इंडिया फोर्ट मुंबई येथे क्लास वन ऑफिसर आहेत तर आई सौ.प्रियंका कुलकर्णी महावितरण मंडळ प्रकाशगड बांद्रा येथे डेप्युटी व्हिजिलन्स ऑफिसर आहे. दोघेही नोकरी करत असून श्रेयंकावर उत्तम संस्कार करत असतात.तिचे आजोबा श्री. पांडुरंग कुलकर्णी हे साहित्यिक, लेखक आणि कवी आहेत. तर आजी सौ. सविता कुलकर्णी या सेवानिवृत्त शिक्षिका असून सद्या विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शिशुवाटिका विभागाच्या सहप्रमुख आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संस्थेच्या बालमंदिर विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 0 ते 6 या वयोगटातील बालमनावर होणारे संस्कार हे दीर्घकाल टिकणारे असतात.बुद्धीचा जवळ जवळ 90% विकास याच कालावधीत होत असतो असं त्यांचं अभ्यासांती स्पष्ट मत आहे.श्रेयंका रामरक्षा तर म्हणतेच, पण गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र अशी अनेक स्तोत्रे तिची मुखोदगत आहेत.तिला गाणी, गोष्टी ऐकायला खूप आवडतात. तसेच सतत प्रश्न विचारून नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडते. अशी ही छोटीशी चिमुरडी येत्या जून मधे शिशुवाटिकेत प्रवेश घेत आहे. दादर मुंबई मधील नामांकित शाळा बालमोहन विद्यालयात तिचा प्रवेश निश्चित झाला आहे.श्रेयंकाच्या या दैदीप्यमान यशामुळे तिचे सर्व ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन होत आहे. तिचे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मधेही नाव येणार असल्याची घोषणा नुकतीच झालेली आहे. या अगोदर यांचसाठी तिला चित्रपट सृष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके यांच्या 155 व्या जयंती निमित्त गोरेगाव मुंबई येथील फिल्म सिटी मधे आयोजित झालेल्या महोत्सवात "परिवार काफ अवॉर्ड" हा ग्लोबल अवॉर्ड ही मिळालेला आहे.
stay connected