आजी,माजी आमदारांनी शेतकरी, सर्वसामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले... माजी राज्यमंत्री Suresh Dhas यांचे टीकास्त्र..

 आजी,माजी आमदारांनी शेतकरी, सर्वसामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले...
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे टीकास्त्र..

************************

सुरेश धस हे विकासाभिमुख तडफदार नेतृत्व.. 
-- चंदूलालजी साहू 

*****************************




********************************

आष्टी (प्रतिनिधी) 

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये  आपला अल्पशा मताने पराभव झाला त्यानंतर गेल्या दहा वर्षातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील आजी आणि माजी आमदारांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही परंतु आपण या आमदारांची उणीव भासू दिली नाही सतत सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करत असून दैनंदिन सुखदुःखात सहभागी होत असतो असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले. 

आष्टा (हरिनारायण) या जिल्हा परिषद गटातील भातोडी, आष्टा (हरिनारायण),आंधळेवादि आणि आष्टी मुर्शदपुर येथील रस्ते कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी भारतीय जनता पार्टीचे छत्तीसगड येथील माजी खासदार आणि ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष चंदुलालजी शाहू उपस्थित होते.

 ते पुढे म्हणाले, आष्टा (हरिनारायण) जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये दर्जेदार रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गावो गावी शेततळे, तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना देताना आपण कोणताही भेदभाव केला नाही 

आजी-माजी आमदारांनी आष्टा (हरिनारायण) परिसरातील गावातील शेतकऱ्यांना योग्य दाबाने आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यासाठी काही उपाय योजने न केल्यामुळे सध्या या परिसरामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणी निर्माण होत आहेत अखेर आपण स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

 दैनंदिन प्रश्नांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी आपले दार सतत खुले असल्यामुळे मी विधानसभा सदस्य नव्हतो तरीही परिसरातील जनतेला मी याची उणीव भासू दिली नाही आपले राजकीय विरोधक जनतेचे मनभेद भरून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत केवळ निवडणुकीच्या काळामध्ये जनतेत मिसळण्याचे काम सुरू असून ठोस विकास कामांचे पुरावे ते देऊ शकत नाहीत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादावर लढवणार असून 

आष्टा हरिनारायण जिल्हा परिषद गटातील जनता हे माझे कुटुंब आहे.

आज आष्टा (हरिनारायण) ते शिंदे वस्ती 3 कोटी 83 लाख रुपये, भातोडी विविध विकासकामांचे भूमीपूजन 3 कोटी 29 लाख आंधळेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन 4 कोटी 8 लाख,मुर्शदपूर खडकत रोड ते 

माऊली मंदिर रस्ता भूमीपूजन 5 कोटी रुपये

पिंपरी रोड भूमीपूजन सिमेंट रस्ता 4 कोटी

 या विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आलो आहे निवडणूक प्रचार काळात मते मागण्यासाठी आल्यानंतर आणखी सविस्तर भाष्य करणार आहोत असे सांगितले



 यावेळी भारतीय जनता पार्टी च्या वतीने आष्टी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील कौल आजमावण्यासाठी निरीक्षक म्हणून आलेले छत्तीसगड येथील माजी खासदार आणि ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल साहू आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,

 सुरेश धस हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाणीव असलेले तडफदार नेतृत्व असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विश्वास सार्थ ठरवण्यासाठी महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांचे सरकार पुन्हा यावे आणि आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा त्यासाठी प्रत्येक मतदार आणि प्रत्येक मत महत्त्वाचे असून या मताद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्व नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून हे नेतृत्व आणखी प्रबळ करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, डाॅ.आंबेडकर यांच्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वांची,  ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज या संतांची आणि वीर सावरकर, चाफेकर बंधू या क्रांतिकारकांची आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा आणावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि परिश्रम करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी जि. प .सदस्य अमर निंबाळकर,सरपंच गणेश माळवे,नगराध्यक्ष जिया बेग,खंडू दादा जाधव, सरपंच अशोक मुळे,माजी सरपंच सचिन लोखंडे,माजी सरपंच अतुल कोठुळे,कपिल अग्रवाल,मनोज धनवडे,सतिष जंगले,बबलू भाई,जितेंद्र शिंदे,किशोर झरेकर,शहादेव नरवडे,अभियंता सौदागर,गणेश पोकळे,आशिष अग्रवाल,बंटी धोंडे,बाळासाहेब बोराडे,अविनाश गिरी यांच्यासह मान्यवर,पदाधिकारी, पत्रकार,आष्टा ह.ना.,आंधळेवाडी,भातोडी, मुर्शदपूर, शिदेवाडी,कासारी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.