*आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयात जागतिक प्राणी दिन साजरा*
माणूस हा अतिशय स्वार्थी प्राणी असून त्याने सर्व मर्यादा ओलांडून पृथ्वीचे शोषण चालवले आहे. भौतिक सुखाच्या मागे लागून मानवाने पृथ्वीवर असलेले अनेक प्राणी, वनस्पती आणि नैसर्गिक घटक यांना हानी पोहोचवल्यामुळे अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्वांबाबत ठोस पावले उचलली नाहीत, तर लवकरच पृथ्वीवरील मानवाचे जीवनही संपुष्टात येईल असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य सिनेट तथा विद्यापरिषद सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
याबाबत अधिक माहिती अशी की कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या आनंद ग्रीन क्लब आणि प्राणीशास्त्र विभागाने वन्यजीव सप्ताह निमित्त जागतिक प्राणी दिन कार्यक्रमा आयोजित केला होता. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एस. के. गांधी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. विशाल वैद्य, प्राणी मित्र नितीन आळकुटे, गणेश पवळ, शैलेश मिश्रा, राजू भोजने, डॉक्टर संभाजी ओव्हाळ इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य विधाते यांनी पृथ्वी निसर्गाचे संरक्षण आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी निश्चित पाऊले उचलणे आवश्यक आहे असे संबोधित केले.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विशाल वैद्य यांनी हवामान बदल प्रदूषण अतिशय अधिवासाचा नाश होऊन जैवविविधता नष्ट होत असल्याचे म्हटले. निसर्गातील अन्न साखळी संतुलित राहण्यासाठी आपल्या परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण करणे आपणा सर्वांचे जबाबदारी आहे. जैवविविधतेची हानी दूर करण्यासाठी आपण सर्वांनी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे जो संवर्धनाच्या प्रयत्नासह मानवी गरजा संतुलित करेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्राणी मित्र नितीन आळकुटे यांनी संकटात सापडलेले प्राणी पशु पक्षी यांना कसे वाचवले याचे अनेक अनुभव सांगितले.
याप्रसंगी श्री.नितीन आळकुटे, शैलेश मिश्रा, गणेश पवळ, राजू भोजने तसेच इतर प्राणी मित्रांचा ते करत असलेल्या कार्याचे कौतुक म्हणून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. एस. एन. वाघुले, प्रा. डॉ. राम बोडखे, प्रा. डॉ. बाळासाहेब धोंडे, प्रा.डॉ. एम. आर. पटेल,प्रा. डॉ. मल्हारी जाधव,प्रा. संतोष बोरुडे, डॉ. संभाजी ओव्हाळ, प्रा डॉ. जीरेकर, डॉ. दिलीप, डॉ. आर. जी. विधाते, प्रा.डॉ. दिलीप बोराडे प्रा.डॉ . सुमन खेडकर, प्रा.डॉ. प्रमिला घुमरे, प्रा.डॉ. गायत्री जगताप, प्रा.डॉ. मंगल टेकाडे,प्रा.डॉ. शैलजा कुचेकर प्रा. रवींद्र गांजुरे, प्रा. किरण कटके प्रा.डॉ. जी. पी. बोडखे, डॉ. सज्जन गायकवाड, डॉ. काळे, डॉ. पानसरे, डॉ. भिमराज गावडे सह इतर प्राध्यापक तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बापू खैरे यांनी केले.सूत्रसंचालन डॉक्टर संभाजी महाराज यांनी केले तर कार्यक्रमाचेआभार कु. सिमरन मुदाळ हिने मानले.
stay connected