मराठा समाजातील तरुणांनो टोकाचे पाऊल उचलू नका, आत्महत्या करुन प्रश्न सुटत नाहीत - माजी आ. भिमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी
मराठा समाजातील तरुणांनो टोकाचे पाऊल उचलू नका, आत्महत्या करुन प्रश्न सुटत नाहीत, सयंम बाळगा, प्रत्येक कठीण प्रश्नातून काही तरी मार्ग निघत असतो असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील आष्टा ( ह. ना. ) येथे केले.
पाटोदा तालुक्यात नायगाव येथील मराठा समाजातील
अर्जुन अंबादास कवठेकर (वय ४३ वर्षे ) यांनी दोन दिवसांपूर्वी आरक्षणासाठी बीड येथे आत्महत्या करुन आपली जिवन यात्रा संपवली. रविवारी सायंकाळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी नायगाव येथे जावून कै. अर्जुन कवठेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य अशोक सव्वाशे, माजी सरपंच बाळासाहेब पवार, युवा नेते किशोर खोले, मार्केट कमिटीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे व इतर उपस्थित होते.
सोमवारी दिनांक ७ आक्टोबर रोजी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील कर्हेवाडी, पांगुळगव्हाण, हाजीपुर,ब्रम्हगांव,आष्टा( ह.ना. ), भातोडी, चिंचपुर,मातकुळी (मैदान),मातावळी (वनवेवाडी) या गावांचा दौरा केला.
आष्टा ह. ना. येथे झालेल्या सभेत मा. आ. भिमराव धोंडे यांनी सांगितले की,
मराठा समाजाला आरक्षणास माझा विरोध नाही, मराठा आरक्षणाला मी सतत पाठींबाच दिलेला आहे. आमच्या शिक्षण संस्थेत सुमारे एक हजार मराठा समाजाचे कर्मचारी आहेत. जवळपास ५० टक्के कर्मचारी मराठा समाजाचे आहेत. आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये. कारण जिवन संपुन प्रश्न सुटत नाहीत. उलट आपले कुटुंब उघड्यावर पडते. लेकरं अनाथ होतात. त्यामुळे यापुढे कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये.
सुरुवातीला आष्टा ह.ना. येथील ग्रामस्थांनी संस्थेच्या शाळेला विरोध केल्याने परिसराचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.आज हिच शाळा शेजारच्या गावात सुरू आहे आतापर्यंत कितीतरी विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत. त्यामुळे चांगल्या कामाला कोणीही विरोध करू नये. दौऱ्याच्या निमित्ताने मातावळी, कर्हेवाडीत येथील ग्रामस्थांनी माजी आ. भीमराव धोंडे यांचे जेसीबीतून फुले उधळूण वाजतगाजत स्वागत केले व रथातून मिरवणूक काढली.
मातावळी येथील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच मलिक साहब दर्गाचे येथे दर्शन घेतले. पै. किरण बाळासाहेब जरे या विद्यार्थ्याची कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर यांनी सांगितले की, सर्वसामान्य लोकांना कसलीच चिंता करायची नसेल तर मा. आ. भिमराव धोंडे यांना सहकार्य करा ते कधीच कोणालाच त्रास देणार नाहीत. दौऱ्याच्या निमित्ताने सरपंच विकास पांढरे, रघुनाथ शिंदे, गळगटे फौजी, शिवाजी वनवे,राजेश कराड, रघुनाथ शिंदे, माजी सरपंच बळीराम गिते, बबनराव सांगळे, अशोक बांगर,आण्णा बांगर,ह.भ.प. सिंधुताई पुजारी, अजय निंबाळकर,बाबुराव कदम व इतरांची भाषणे झाली.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, माजी शिक्षण सभापती नियामत बेग,सरपंच बबनराव डोके, झांबरे मुकादम, रघुनाथ पठाडे, संभाजी जगताप,अज्जुभाई, सिद्धेश्वर शिंदे, केदार गिते, सुधाकर डोके, सोमनाथ गिते,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, सरपंच अंबादास बांगर, विकास ढवळे, सुभाष ढवळे, कुंडलिक आस्वर, सुरेश जरे, अनिल पाटील, सरपंच छायाताई गायकवाड, उपसरपंच बाळू सांगळे, रामदास सांगळे, विजय सांगळे, माजी सरपंच हरिभाऊ गिते, संदीप निकाळजे, आत्माराम राख, अंकुश राख, संतोष वाल्हेकर, माणिक वाल्हेकर, माजी सरपंच अस्लम पठाण, माजी सरपंच अमृतराव भंडारी, प्रकाश शिंदे, लहु सानप, विकास वनवे, रामदास बांगर, केशव वनवे, मच्छिंद्र वनवे, बाबुलाल पठाण, रावसाहेब बांगर, जमीर पठाण, अंबादास बांगर, ऋषीकेश खंडागळे, किसन बांगर व इतर उपस्थित होते.
stay connected