BULDHANA | देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे द्यावे- राजू शेट्टी

 BULDHANA | देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे द्यावे- राजू शेट्टी 



- बांगलादेशपासून काहीतरी शिकावं, आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी काल अकोल्यात उपस्थितांना विचारला. राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलत होते. वाद वाढत असतांना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी मूर्तिजापूर येथील शेतकरी सहविचार सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काही तरी शिकावं. जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही. या वक्तव्यावर काल पासून टीका केल्या जात आहे. यावर आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि काटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण दिले ते म्हणाले कि, जेव्हा सरकार जनतेच्या मनाविरुद्ध धोरण राबवते आणि ते थोपवण्याचा प्रयत्न करते त्यावेळी जनता बंड करून उठते हे बांगलादेशाच्या जनतेने करून दाखविले आहे. बांगलादेश सारखी वेळ आपली येऊ नये यासाठी वेळीच आवरायाला पाहिजे असा इशारा देण्याच्या भावनेतून आपण बोललो असल्याचे ते म्हणाले आहेत. आपण स्थापन करीत असलेल्या आघाडीमध्ये कुणाकुणाला स्थान राहणार याबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीसाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर, प्रहारचे बच्चू कडू आणि मराठा आरक्षणावर लढणारे मनोज जरांगे यांच्यासह शेतकरी चळवळीतील इतर पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्या संदर्भात सध्या नियोजन सुरू आहे येणाऱ्या काळात ती पूर्ण होईल असेही ते म्हणाले आहेत. छत्रपती संभाजी नगर येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की जलील हे माझे जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत ची भेट ही मित्रत्वाची होती राजकीय भेट नसल्याचे त्यांनी सांगितले.बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका महिलेला पोलीस ठाण्यात भाजपच्या एका नेत्याकडून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. ते म्हणाले की, सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. यामुळे यावर सरकारची किती पकड आहे हे दिसून येते त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा सल्ला आहे की बाकीचे राजकारण बाजूला ठेवा आणि गृह खात्याकडे लक्ष द्या किंवा लक्ष द्यायचं नसेल तर सदर खाते हे दुसऱ्या सक्षम माणसाकडे द्या अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.