मंजूर कामाचेच नारळ मी फोडतो मंजुरीच्या अगोदर नारळ फोडण्याची सवय आम्हाला नाही
------आ.बाळासाहेब आजबे यांचा विरोधकांना टोला
पाटोदा (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत या योजना प्रत्येक गावामध्ये सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्याचबरोबर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत आपण गावात केलेली विकासकामाचे लोकार्पण व मंजूर कामांचे उदघाटन करणे व ही कामे जनतेला माहिती व्हावेत या उद्देशाने हा गाव भेट दौरा सुरू आहे परंतु विरोधकांकडून मी करत असलेल्या मंजूर कामांच्या उद्घाटनाबाबत टीका केली जात आहे, मला विरोधकांना एवढेच सांगायचे आहे की मी मंजूर केलेल्या कामाचेच नारळ फोडतो मंजुरीच्या अगोदर नारळ फोडण्याची सवय आम्हाला नाही, विरोधकांनी10 वर्षापूर्वी विकास कामाच्या नावाखाली गावागावात अनेक नारळ फोडली त्या कामांचे काय झाले हे जनतेला सांगावे असा टोला आमदार बाळासाहेब आजबे यांनी नाव न घेता पाटोदा तालुक्यात गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलताना विरोधकांना लगावला आहे.
गेल्या पाच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये आपण मतदारसंघांमध्ये मूलभूत गरजा लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा पाणी ,रस्ते विजेचा प्रश्न प्रामुख्याने हाताळत तो कसा सोडवता येईल यासाठी प्राधान्यानेअनेक गावांमध्ये 160 कोटी रुपयांचे बंधाऱ्याची कामे मंजूर केली आहेत तर पांदण रस्ता योजनेच्या माध्यमातून 500 पेक्षा जास्त रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे त्याचबरोबर इतर विकास कामे मोठ्या प्रमाणात केली असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलताना सांगितले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सध्या सुरू असून शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी येवलवाडी नागरगोजे सावरगाव सोने सोनेगाव सौंदाना वैद्यकिन्ही मेंगडेवाडी या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांची भेटी देऊन ग्रामस्थांची चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दिपक दादा घुमरे, बाबासाहेब शिंदे ,बाबासाहेब जाधव, अंगद भोंडवे, शिवाजी नेमाने, सुरेश शिंदे, भीमराव बांगर, भगवान शिंदे,अंगद घुमरे, हनुमान शिंदे, राजाभाऊ कदम ,भागवत रंजवन यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन आपण पाच वर्षात केलेली कामे त्या कामांचे लोकार्पण व उद्घाटन करून ती कामे लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम या दौऱ्याच्या निमित्ताने केली जाणार आहे ,त्याचबरोबर शासनाने ज्या लोक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत त्या योजनांची माहिती ग्रामस्थांच्या भेटी गाठी घेण्यासाठी व गावात झालेल्या कामांची माहिती लोकांना व्हावी म्हणून हा दौरा आयोजित केला आहे लाडकी बहीण योजना, सौर पंप योजना ,मोफत गॅस योजना , मुलींसाठी मोफत शिक्षण योजना यासारख्या शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा जनतेने लाभ घ्यावा व कार्यकर्त्यांनी ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करावे शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांचा पीक पेरा लावून घ्यावा जेणेकरून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळण्यास मदत होईल, गेल्या पाच वर्षांमध्ये आपण कोणाचे वाईट होईल असे कोणतेही काम केले नाही, आमदार हा लोकांच्या समस्या सोडण्यासाठी असतो समस्या निर्माण करण्यासाठी नसतो म्हणून पाच वर्षाच्या काळात आपण भावाभावात किंवा गावागावात भांडण लावण्याचे काम केले नसून आपसातील भांडणे मिटवण्याचे प्रामाणिक काम केले आहे म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यामध्ये शांतता नांदत आहे, आपण गेल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघात जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून आणून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे मतदारसंघातील गाव ,वाडी ,वस्ती या प्रत्येक ठिकाणी विकास कामे झालेली आहेत कोणत्याही कामांमध्ये अनिमित्त झालेली नसून लोकांना विकास कामे दिसत असल्यामुळेच लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपकदादा घुमरे, जेष्ठ नेते बप्पासाहेब जाधव, सरपंच शिवाजी नेमाणे, सरपंच आनंद घुमरे, अंगदशेठ भोंडवे लहु नागरगोजे, अविनाश पवार, संजय पवार,मधुकर नागरगोजे सर,राजु नागरगोजे
योगेश शिरसाठ सावरगाव सोनेगाव सरपंच नारायण नागरगोजे, सुरेश बडे,अनिल दगडखैर बंडू वायभसे, भाऊसाहेब चौरे पाटील,विठ्ठल चौरे ,निलेश देवडे श्रीहरी राख, नाना कवठेकर, बालाजी कवठेकर,महेमुद शेख,बंडु वाघुले रंजित बांदल
सोंदाणा रमेश कदम युवराज कदम बाळासाहेब कदम, दत्ता कदम, नारायण गायकवाड, संभाजी कदम, संतोष कदम,दादा कदम, वैद्यकिन्ही . भाऊसाहेब भराटे,जयवंत बप्पा शिंदे, रामचंद्र मकाळ, बाबासाहेब शिंदे, लालासाहेब नांदे,प्रकाश कुलकर्णी,रामुकाका लांडगे, विठ्ठल मकाळ, महादेव मकाळ, मारुती मकाळ, वसंत शिंदे, पांडुरंग शिंदे, पिराजी शिंदे,वाघीरा अशोक बांगर , प्रकाश बांगर,नारायण आण्णा बांगर, बाबासाहेब बांगर, मदन बावने, नवनाथ बांगर, सर्जेराव बांगर,जिवन बावने, सुरेश बांगर, विठ्ठल बांगर, बाळासाहेब बांगर, अक्षय बांगर,अजिनाथ बांगर,विजय बांगर,सोमीनाथ बांगर,मेंगडेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट दिली. व तसेच को प बंधाराचे भुमीपुजन केले. यावेळी जेष्ठ नेते बाबासाहेब भाऊ शिंदे, सुरेश शिंदे, भिमराव बांगर, हनुमान शिंदे, राजाभाऊ कदम,भागवत रांजवन, विष्णु शिंदे, कैलास शेंडगे, उत्तम खिलारे तसेच ग्रामस्थ ,महिला यांच्यासह धानोरा गणातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected