कडा शहरात 'हर घर तिरंगा' रॅलीने 'भारत माता की जय' चा जयघोष
आष्टी प्रतिनिधी - तालुक्यात शैक्षणीक क्षेत्रात नाव लौकीक मिळवलेले अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित मोतीलाल कोठारी विद्यालयाने मंगळवार दि.१३ आगस्ट रोजी 'हर घर तिरंगा 'रँलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा झेंडा व घोषवाक्याचे फलक घेऊन पुर्ण गावात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांचा जोश व उत्साहाने नागरिकांमध्ये देशभक्तीचे वातावरण तयार झाले. कडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने या रँलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच श्री युवराज पाटील, श्री. उपसरपंच दिपक कर्डीले व ग्रामपंचायत सदस्य यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन नागरिकांना प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आव्हान केले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री शिकारे एम.ई, उपमुख्याध्यापक श्री. सरडे,पर्यवेक्षक श्री गोले, स्काऊट मास्टर श्री जाधव के.बी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी भव्यदिव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्द्ल अभिनंदन केले.
stay connected