भारतीय युवक त्याची राजकीय सामाजिक आणी आर्थिक स्थिती आणी समाजव्यवस्था-डॉ.जितीन वंजारे

 *भारतीय युवक त्याची राजकीय सामाजिक आणी आर्थिक स्थिती आणी समाजव्यवस्था-डॉ.जितीन वंजारे*



          युवकांनो अशी झेप घ्या की यश तुमच्या मागे पळेल तुम्हाला यशाच्या पाठीमागे पळण्याची गरज भासणार नाही असं सांगणारे स्वामी विवेकानंद शिक्षण वाघिणीचे दूध आहे  ते

प्राशन करा आणी स्वतःचा उद्धार करा असं सांगणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, पृथ्वी शेषनागावर नाही तर कामगारांच्या तळहातावर टिकून आहे येथील सर्व काही येथील कष्टकरी शेतकरी आहे त्याला जपलं पाहिजे असं ठणकावून सांगणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे,शिक्षणाने उद्धार होतो कुळ सुधारते शिक्षणाने गुलामी दूर होते असं सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, समतावादी विचारांचे छत्रपती, राजाधिराज लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या सगळ्यांच्या विचारांची आज खरी गरज भारताला आहे.आज भारतात भलतच घडत आहे सुसंकृत भारताची लाज जाते आहे चार पाच वर्षाच्या पोरींवर बलात्कार होत आहे, दलित, आदिवाशी, महिलांवर अत्याचार अन्याय वाढत आहेत, गेल्या दहा वर्षात हे अत्याचार शंभर पटीने वाढले आहेत आमचा गृहमंत्री झोपेत आहेत. आम्हाला ज्ञान देणारे भरपूर धर्म ग्रंथ, महाकाव्य, पुस्तक आहेत तरीही सगळ्यात घाण आमच्याच भारतात आहे.

            आमचे खायचे आणी दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, आमचा तरुण भरकटलेला आहे, येथील तरुणाला योग्य दिशा नाही त्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी येथील यंत्रणा पाहून देशाचं वाटोळं होणार हे नक्की कारण येथील युवकांना आर्थिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान,सामाजिक भान उरलेलं नाही, छू म्हटलं की भुंकायचं आणी सांगितलेल्या गरिबांचे लचके तोडायचे हे सर्रासपणे घडत आहे.भारतात नदीला पूजल जात आणी सगळ्यात जास्त घाण तिच्यात सोडतात बहिणीच्या संरक्षणासाठी रक्षाबंधन केल जात आणी इथेच जास्त रेप होतात. जगातील सगळ्यात जास्त देव इथेच आहेत आणी भूत,चिंध,हाडळ पण इथेच जास्त आहेत, गाईला माय इथंच मानलं जातंय आणी कत्तल खाणे पण याच भारतात खूप जास्त आहेत, ती पण त्याच धर्माच्या ठेकेदारांची,याच देशात गोमूत्र पिलं जातंय अगदी आनंदाने आणी दगडावर दूध ओतल जातंय भरमसाठ त्यामुळेच कदाचित हंगर इंडेक्स मध्ये भारत पहिल्या दहा मध्ये आहे, भिकारी लोकांच्या झुंडीच्या झुंडी इथेच पाहायला मिळतात. याच देशात सत्संग,संत संगत, प्रवचणे कीर्तने, सप्ताह गावोगावी वाड्या वस्त्यावर केले जातात आणी इथेच सगल्यात नीच हैवानांची टोळी निर्माण होतेय, इथेच बाबा बुआ सन्याशी अत्याचार अन्याय आणी रेप करून तुरुंगाची हवा खातायेत, हीच ती संतांची भूमी आहे पण ह्याच भूमीत स्वतःला मोठमोठ्या उपमा लावणारे भगोडे, फसवे, रेपिस्ट लोक आहेत, इतर देशात गाईला गाय, आईला आई, नदीला नदी मानतात तिथे सगळं स्वच्छ सुंदर वातावरण आहे पण इथे नद्यानी दुनियाची घाण आहे, दिवसा धवळ्या कोवल्या लहान मुलींचा रेप होतोय वरतून न्याय मागणाऱ्यांना तुरुंगात डांबून टाकलं जातंय, धर्माच्या देवाच्या नावावर अमाप पैसा जमवून राजकीय पार्टी तयार करून इथेच त्या पैशावर ज्यांना हिमालयात तापश्चर्य करायला पाहिजे त्या लोकांच्या हातात संसद दिली जातेय, धर्माच्या भेकड बाता सांगून इथेच तर लुटलं जातंय आक्खा देश. सर्व धर्म समभाव मानून इथेच तर आरडाओरड केली जाते आणी जातीय धार्मिक पाक्षिक आणी प्रांतिक भांडणे ह्याच देशात जास्त आहेत, हा देश शेतकऱ्यांचा कृषिप्रधान म्हटला जातोय आणी इथेच तर सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्याच होतात, शेतकऱ्यांच्या मढ्याच लोणी खाणाऱ्या हरामखोर औलादी इथेच तर आहेत, दोन हजार सन्मान निधी देऊन व्होट बँक भरवणारे डोम कावळे आमच्या शेतीमालाला कवडिमोल भाव देतात. राबराब राबणारा शेतकरी बाप शेतात अमाप कष्ट करतो आणी त्याच वाया गेलेल पोरगं शेतकऱ्यांच्या रक्त पिणाऱ्या हरामखोर नेत्याला दादा काका मामा नाना भाऊ तात्या अश्या अनेक उपाधी देऊन नेत्यांच्या पिढ्यानं-पिढ्या सेफ करायला निघाला आहे.धर्माच्या नावाखाली त्याच मस्तक पेटवून स्वतःची पोरं बाहेरच्या देशात शिक्षणासाठी पाठवणाऱ्या देश पेटवणाऱ्या नेत्याचा गुलाम हा घर संसाराची ची राखरांगोळी करून, आई बाबाचं स्वप्न धुळीस मिळवून, स्वतःच्या पाई धोंडा मारून मोकाट दंगालीत स्वतःला गुंतवून घेऊन जेलची हवा खातो त्याला कोणी भेटायलाही येत नाही. आणी जेंव्हा डोळे उघडतात तेंव्हा अक्खी वाट लागलेली असतें. दंगलीच्या केसेस ने सगळं आयुष्य बरबात होत, शासकीय नौकरी लागत नाही आणी मग त्याचा प्रवास चालू होतो तो व्यसनाधिनतेचा....! मग पूडी, खर्रा, दारू, गांज्या आणी ड्रुग्स असा एकंदरीत आयुष्य बरबात होऊन त्याच नेत्यांची कायम चप्पल चाटत एक बाटली आणी अर्धाकिलो मटणावर हा नेत्यांची अक्खी खाणदान पुढे घेऊन जातो. नेता गावात, परगावात, शहरांत बंगले,शेती,उद्योग घेतो आणी अब्जावधी बनतो आणी हा मात्र युवा नेता, मोठे साहेब छोटे साहेब करीत इथेच सतरंज्या उचलत गुलामीच जीवन जगतो.हे बंद करा शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना  न्याय द्या, युवकांना बेरोजगारी पासून व्यसना पासून मुक्त करा. नेत्यांना त्यांची जागा दाखवा. सुशिक्षित सुजान नागरिक म्हणून बोलायला शिका, वाईटला वाईट आणी चांगल्याला चांगलं म्हणा.....

*लेखन डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर ९९२२५४१०३०*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.