मतदारसंघात पाणी,वीज आणि रस्त्यांना प्राधान्य देत विकास कामे केली -आ.बाळासाहेब आजबे
आष्टी प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये आपण मतदारसंघांमध्ये मूलभूत गरजा लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा पाणी आणि विजेचा प्रश्न प्रामुख्याने हाताळत तो कसा सोडवता येईल यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले असून खुंटेफळ साठवण तलावासाठी1100 कोटी ,बंधाऱ्या कामासाठी 200 कोटी ,मतदार संघात नऊ सबस्टेशनसह 638 विद्युत रोहित्राना मंजुरी मिळवली असून पांदण रस्ता योजनेच्या माध्यमातून 500 पेक्षा जास्त रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे त्याचबरोबर इतर विकास कामे मोठ्या प्रमाणात केली असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलताना सांगितले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सध्या सुरू असून शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सबलखेड,धानोरा दौलवडगाव हिवरा पिंपरखेड भोजेवडी डोंगरगण या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांची भेटी देऊन ग्रामस्थांची चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे ,नामदेव शेळके ,यश भैया आजबे, धैर्यशील थोरवे, दिलीप चव्हाण, बबन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन आपण पाच वर्षात केलेली कामे त्या कामांचे लोकार्पण व उद्घाटन करून ती कामे लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम या दौऱ्याच्या निमित्ताने केली जाणार आहे ,त्याचबरोबर शासनाने ज्या लोक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत त्या योजनांची माहिती ग्रामस्थांच्या भेटी गाठी घेण्यासाठी व गावात झालेल्या कामांची माहिती लोकांना व्हावी म्हणून हा दौरा आयोजित केला आहे लाडकी बहीण योजना, सौर पंप योजना ,मोफत गॅस योजना , मुलींसाठी मोफत शिक्षण योजना यासारख्या शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा जनतेने लाभ घ्यावा व कार्यकर्त्यांनी ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करावे शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांचा पीक पेरा लावून घ्यावा जेणेकरून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळण्यास मदत होईल, गेल्या पाच वर्षांमध्ये आपण कोणाचे वाईट होईल असे कोणतेही काम केले नाही, आमदार हा लोकांच्या समस्या सोडण्यासाठी असतो समस्या निर्माण करण्यासाठी नसतो म्हणून पाच वर्षाच्या काळात आपण भावाभावात किंवा गावागावात भांडण लावण्याचे काम केले नसून आपसातील भांडणे मिटवण्याचे प्रामाणिक काम केले आहे म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यामध्ये शांतता नांदत आहे, आपण गेल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघात जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून आणून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे मतदारसंघातील गाव ,वाडी ,वस्ती या प्रत्येक ठिकाणी विकास कामे झालेली आहेत कोणत्याही कामांमध्ये अनिमित्त झालेली नसून लोकांना विकास कामे दिसत असल्यामुळेच लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी बोलताना सांगितले या कार्यक्रमासाठी काकासाहेब शिंदे, हरिभाऊ दहातोंडे ,यश भैया आजबे,नामदेव शेळके ,दिलीप चव्हाण, रामदास पालवे, महादेव चव्हाण ,शिवलिंग चव्हाण, रामदास पालवे ,चंद्रभान वामन, डॉक्टर गव्हाणे, परमेश्वर चव्हाण ,राजेंद्र गव्हाणे, सुरेश आवटे ,राहुल शेळके, बाबासाहेब कापसे ,दिनकर गरजे , पोपट चव्हाण ,सुभाष चव्हाण, उद्धव घोडके, सुरेश कोल्हे ,बाबासाहेब पोटे, विठ्ठल गीते ,दादा निंबाळकर, भागिनाथ विधाते, दीपक पोकळे तुळशीराम पोटे, रभाजी पारखे, धुळा लकडे, शहादेव वाघमोडे यांच्यासह धानोरा गणातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected