निवडणुका लागणार म्हणून फिरणाऱ्यांनी जनता कोरोना काळात मरणाच्या दारात होती तेव्हा कुठे गेले होते? - सुरेश धस यांचा विरोधकांना सवाल

 निवडणुका लागणार म्हणून फिरणाऱ्यांनी जनता कोरोना काळात मरणाच्या दारात होती तेव्हा कुठे गेले होते? - सुरेश धस यांचा विरोधकांना सवाल

**************************






**********

आष्टी (प्रतिनिधी) 

स्वतःला पुढारी म्हणून घेणारे,निवडणुका लागणार म्हणून गावोगाव दौरे काढणारे कोरोना काळात जनता भयभीत होती,अक्षरशः मरणाच्या दारात होती अशा वेळी त्यांना धीर देण्याचे आणि त्यांना बळ देण्याचे काम ज्यांनी करायला पाहिजे होते त्या वेळेस हे सगळे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत घरात बसून होते.मात्र मी हातात भोंगा घेऊन लोकांच्या दारोदार जात भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे म्हणत होतो मग त्या वेळी हे कुठे गायब झाले होते असा सवाल माजी मंत्री सुरेश धस यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे.आष्टी तालुक्यातील पुंडी येथे टाकळी गणाच्या तर सुलेमान देवळा येथे धानोरा गणाच्यावतीने आयोजित जनसंवाद मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना धस म्हणाले की,ज्या कोरोनाच्या कालावधीत नातेवाईक तर सोडाच सख्खे देखील जवळ येत नव्हते अशावेळी मी जीवाची परवा न करता सर्वसामान्य जनता गोरगरीब जनता या महामारीच्या खाईतून कशी बाहेर काढता येईल शिवाय कोरोनाच्या भीतीने अनेकांना धीर कसा देता येईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला यासाठी मी आष्टी पाटोदा शिरूर या तीनही तालुक्यातील गाव न गाव पिंजून काढले हातात भोंगा घेऊन भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे हे ठामपणे सांगत होतो शिवाय मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या माध्यमातून 13 हॉस्पिटल व 33 कोविड सेंटर चालवण्याचे काम केले त्या माध्यमातून सर्वांना रुग्णसेवा उपलब्ध करून देण्याचे काम केलं. वेळप्रसंगी घरापासून पाच सहा महिने लांब राहावे लागले मात्र मी माझ्या जनतेला वाऱ्यावर सोडले नाही. कोविड सेंटर असेल कोविड रुग्णालय असतील त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांशी मी स्वतः चर्चा करत होतो त्यांना धीर देण्याचे काम करत होतो णि हे काम स्वतःला पुढारी म्हणवून घेणाऱ्यांचे असते.अनेकांना लागेल ती मदत भले ती आर्थिक जरी असली तरी ती करण्याचे प्रामाणिक काम केले. म्हणूनच आज ही सर्वसामान्य जनता माझ्यावरती भरभरून प्रेम करते. मात्र सध्या आष्टी मतदार संघात निवडणुका जवळ येत असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे अनेक इच्छुक निवडणूक लढविण्यासाठी तयार झालेले आहेत जे आता गावोगाव आपले दौरे करत आहेत आणि लोकांना आम्ही किती कामाचे आणि आम्हाला तुमचा किती कनवळा आहे हे दाखवण्याचा जो खोटा प्रयत्न करत आहेत त्याला सर्वसामान्य जनता कधीच बोलणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे निवडणुका आल्या म्हणून दौरे काढणाऱ्यांनी सर्वसामान्य जनता मरणाच्या दारात असताना घरात बसणे पसंत केले अशांना आता कायमस्वरूपी घरात बसविल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आगामी विधानसभेच्या कामाला माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी लागावे असे आवाहन शेवटी धस यांनी केले.

या मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर ह.भ.प. जगताप महाराज,ह.भ.प. आदेश महाराज,ह.भ.प. गोविद महाराज जगताप,माजी भाजपा तालुकाध्यक्ष पांडुरंग चौधरी,भाजपा जेष्ठ नेते रमेश ढगे,माजी उपसभापती गोपाळभाऊ रक्ताटे, भीमराव माळशिखरे बापू,जयशिंग गव्हाणे,सरपंच मनोज थोरवे,सरपंच भाऊसाहेब गावडे,राहुल सुरवसे,राजेंद्र गावडे,पंढरीनाथ भालेराव,सरपंच ईश्वर मेटे,सरपंच ज्ञानेश्वर खराडे,माजी सरपंच रिंकू बेलेकर,तानाजी अनभुले,भाऊसाहेब झांजे,अशोक तरटे,उपसरपंच पवन तरटे,माजी उपसरपंच महादेव शिंदे,के.के.काकडे,संदीप खराडे,उपसरपंच दळवी,पंडीत पोकळे,मुकेश काळे,सीताराम झांजे,परमेश्वर पांडुळे,सचिन एकशिंगे,संदीप चौधरी,धनंजय पडोळे,अशोक पडोळे,सूत्रसंचालन आकेश वाडेकर तर सुलेमान देवळा येथील मेळावा प्रसंगी जि.प.सदस्य रामहरी महारनोर,माजक सभापती अंकुश चव्हाण,माजी उपसभापती राजेंद्र दहातोंडे,पप्पू बांदल,माजी सरपंच अंकुश गीते,सुरेश गर्जे,अशोक घोडके,अशोक लगड,राजाभाऊ शेळके,आदीसह टाकळी अमिया गण व धानोरा गणातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक,महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.