शालेय वक्तृत्व स्पर्धेत सिद्धांत वाल्हेकर व आदित्य वांढरे प्रथम

 शालेय वक्तृत्व स्पर्धेत
सिद्धांत वाल्हेकर व आदित्य वांढरे प्रथम 





    आष्टी ( प्रतिनिधी )

     लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त गणेश विद्यालय आष्टी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 01 ऑगस्ट 2024 रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. लहान गटामध्ये सिद्धांत वाल्हेकर याने तर मोठ्या गटात आदित्य अण्णासाहेब वांढरे यांनी प्रथम क्रमांक पटकावले. 

        यशस्वी स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. 

  🔥लहान गट 

   प्रथम: सिद्धांत वाल्हेकर 

(रुपये 701 ट्रॉफी व प्रमाणपत्र)

   द्वितीय: स्वप्निल मुरकुटे 

(रुपये 501 ट्रॉफी व प्रमाणपत्र)

   तृतीय: सय्यद बिहान 

(रुपये 301 ट्रॉफी व प्रमाणपत्र)

  🔥 मोठा गट 

प्रथम: आदित्य अण्णासाहेब वांढरे 

(रुपये 701 ट्रॉफी व प्रमाणपत्र)

द्वितीय: पायल शिवाजी वांढरे 

(रुपये 501 ट्रॉफी व प्रमाणपत्र)

तृतीय: यश मनोहर भोगाडे.

(रुपये 301 ट्रॉफी व प्रमाणपत्र)

     लहान गटामध्ये एकूण 24 स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर मोठ्या गटामध्ये 14 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी परीक्षक म्हणून के.डी.सारूक सर, सुधीर अष्टेकर सर व नवनाथ मोरे सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा पोकळे व श्रीमती सुरेखा हजारे यांनी केले.

🚩वक्तृत्व गुणामुळे नेतृत्व मोठे होते 🚩

      जगामध्ये व्यक्त व्हायचे असेल तर वक्तृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगल्या वक्तृत्वामुळेच समाजाला वक्त्याची ओळख होते. माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख तसेच माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे हे आपल्या वक्तृत्वगुणामुळेच मोठे झाले आहेत. एवढेच नाही तर जग जिंकू पाहणारा जर्मनीचा राजा हिटलर आपल्या वक्तृत्वामुळेच मोठा झाला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे व्यक्तिमत्व सुद्धा वक्तृत्व गुणसंपन्न होते. त्यामुळेच ते समाजामध्ये जनजागृती करू शकले. असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षिय भाषणामध्ये इंजि. तानाजी बापू जंजिरे यांनी केले.

       पुढे बोलताना इंजि. जंजिरे म्हणाले की, जगामध्ये अवघे साडेतीन टक्के लोक आपले ध्येय सुरुवातीपासूनच निश्चित करतात. आणि मोठे होतात. म्हणून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. आपल्या ध्येयावर सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणजे आपले ध्येय गाठता येते. असेही ते पुढे म्हणाले. 

     जिजाऊ ब्रिगेडच्याअध्यक्षा ॲड. निर्मलाताई सोनवणे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थी दशेमध्ये सर्वांना सारखी संधी मिळते. परंतु जे जास्त परिश्रम घेतात त्यांना मोठे यश मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन नावलौकिक मिळवावा. स्पर्धेचे संयोजक ॲड. सिताराम पोकळे यांनी पुढील वर्षी या स्पर्धा तालुका पातळीवर घेण्याचे संकेत दिले. संदीप गावडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर निळकंठ सुंब्रे सरांनी सर्वांचे आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेशसिंह देसुरकर पर्यवेक्षक ए. बी .गाडेकर सर व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी परिश्रम घेतले.


.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.