हिंदू-मुस्लिम धर्मामध्ये जाणुनबुजुन जातीय तेढ निर्माण करणा-या रामगीरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा

 हिंदू-मुस्लिम धर्मामध्ये जाणुनबुजुन जातीय तेढ निर्माण करणा-या रामगीरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा



आष्टी/ प्रतिनिधी 

गुण्यागोविंदाने एकत्रपणे नांदत असलेल्या हिंदू मुस्लिम धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करून तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी आष्टी येथील मुस्लिम समुदायाच्या वतीने पोलीस निरीक्षक आष्टी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दोन दिवसापूर्वी उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन करत मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्याने रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे या मागणीचे निवेदन आष्टी पोलिस निरीक्षक यांना मुस्लिम समाजाने दिले आहे.

आष्टी पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे. त्यांनी इस्लामचा सुक्ष्म अभ्यास केला असता, त्यांना यात अन्याय-अत्याचाराशिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे. मोहम्मंद पैगबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षांच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या

प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगीरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणुनबुजुन धार्मिक भावना दुखवुन जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करुन घेण्यात येत असल्याचे समजते. तसेच नितेश राणे हा सुध्दा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जाणुनबुजुन चिथावणीखोर भाषण करत आहे. मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात त्यामध्ये फक्त इस्लाम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणुन कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते. कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्ये केली जात नाही. भामट्या महाराजांच्या वक्तव्यामुळे समाज जीवनाताल एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर  आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.