आरक्षणाच्या मुद्यावरुन समाजात सामाजिक मतभेद होऊ नयेत- अॅड, आंबेडकर
------------------
राजेेंद्र जैन / कडा
---------------------
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय मतभेद असतील पण त्याचे रूपांतर सामाजिक मतभेदांमध्ये होऊ नये. यासाठीच आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड, प्रकाश आंबेडकर यांनी कडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगीतले.
महाराष्ट्र राज्यात दि.२५ जुलैपासून वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव रॅली सुरू झाली आहे . या निमित्ताने कडा येथे आल्यावर आज बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना अॅड, प्रकाश आंबेडकर म्हणाले की आरक्षणाच्या निमित्ताने राजकीय मतभेद जरूर असतील. पण त्या मतभेदाचे रूपांतर सामाजिक मतभेदांमध्ये होऊ नये. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यात आरक्षण बचाव रॅली सुरू करण्यात आली आहे . मनोज जरांगे यांची मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश ही मागणी आणि सगेसोयरे अध्यादेशाचा आग्रह याबद्दल सर्वच राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विविध कारणाने ज्यावेळी दंगली झाल्या त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने सामाजिक सालाख्याची भूमिका घेत समाजातील मतभेदाचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. हाच आरक्षण बचाव रॅलीचा उद्देश समोर ठेवून महाराष्ट्रावर यात्रा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले . मराठा आरक्षणा बाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट न करता, आरक्षणासाठी मोदीकडे जाऊ असे उध्दव ठाकरे यांचे म्हणणे आणि महाराष्ट्राचा मणिपूर होईल हे शरद पवार यांचे वक्तव्य हे दोन्ही दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोणी कोणाला मते द्यावीत हा प्रत्येकाचा आपापला अधिकार आहे . पण त्यानंतर जसा सामाजिक सलोखा जपला जातो तोच आरक्षण मागणी बाबत ही असावा असे मत अॅड, आंबेडकर यांनी व्यक्त केले . """""""""""""""""""""""""""""""
Vdo पहा 👇📽️
stay connected