जनतेच्या मागणीनुसार प्रत्येक गावात विकास कामे केली - आ.बाळासाहेब आजबे
आ.आजबेंच्या गाव भेट दौऱ्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आष्टी प्रतिनिधी
आपण आमदार झाल्यापासून आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये लोकांनी मागणी केलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले व त्यातील 90 टक्के कामे पूर्णही केली आहेत लोकांनी मागणी केल्यानुसार जे काम आपल्याला करणे शक्य आहे त्याच कामासाठी आपण शब्द दिला आणि ती सर्व कामे आपण आजपर्यंत पूर्ण केले आहेत, प्रत्येक गावातील जनतेच्या मागणी नुसार विकास काम पूर्ण करण्यासाठी आपण निधी दिला असून यापुढेही उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे आमदार बाळासाहेब आजबे यांनी लोणी गटातील गाव भेट दौऱ्या दरम्यान पिंपळा येथे बोलताना सांगितले .
आष्टी पटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी बुधवार 31 जुलै पासून गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे आज पहिल्या दिवशी लोणी गणातील गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधला या गाव भेट दौऱ्याला गावातील जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे यामध्ये प्रत्येक गावामध्ये आजपर्यंत केलेल्या विकास कामांचे लोकार्पण तर मंजुरी मिळालेल्या कामांचे उद्घाटन करण्यात येत आहेत. आज बुधवार रोजी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या सह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये लोणी गणातील खुंटेफळ वाटेफळ, लोणी सय्यदमीर, साकत पिंपळा, धनगरवाडी, खरडगव्हाण ,काकडवाडी सोलापूरवाडी ,खुंटेफळ, वाहिरा ,पारोडी बोरोडी डोंबळसांगवी सुंबेवाडी व हातोळण या गावांना भेटी देऊन या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ त्याच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे, संदीप सुंबरे ,लोणी गटप्रमुख सुभाष वाळके, बाबासाहेब शेंडगे, बाबा भिटे उपस्थित होते .
------------–-----------
*फैसला ऑन द स्पॉट*
गाव भेट दौऱ्यादरम्यान गावातील लोकांनी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्यासमोर वेळेवर रेशन मिळत नाही, लाईट वेळेवर येत नाही यासारख्या समस्या समोर मांडल्या असता या सर्व समस्या ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी तात्काळ आमदार बाळासाहेब आजबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून दोन दिवसात उपाययोजना करण्याचे आदेश दिले, गावातील जनतेने समस्या सांगताच त्या ऑन द स्पॉट सोडवल्यामुळे ग्रामस्थांच्या तोंडावर समाधान दिसत होते.
-----------------–
यावेळी पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की आपण आजपर्यंत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघांमध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपये चे विकास कामे मंजूर करून आणले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने खुंटेफळ साठवण तलाव योजनेतील शिंपोरा ते खुंटेफळ थेट पाईपलाईन योजनेसाठी 1100 कोटी रुपये मंजूर केले आहेत ही आष्टी तालुक्यासाठी महत्त्वाकांची योजना आहे या योजनेबरोबरच आष्टी उपजिल्हा रुग्णालय ही मंजूर करून आणले आहे याच बरोबर शासकीय इमारती व गावागावात आवश्यक असणारे कामे मोठ्या प्रमाणात मंजूर केले आहेत त्यातील 60 ते 70 टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरू आहेत गावातील जनतेकडून ज्या कामाची मागणी केली गेली ते कामे आपण गावकऱ्यांच्या मागणी नुसार पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहेत, जवळपास 113 गावांमध्ये सभामंडप दिले आहेत, आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली असून प्रत्येक गावात विकास कामे केली आहेत मतदारसंघातील जनतेला कुठलाही त्रास होणार नाही असे आपण एकही काम केले नाही त्यामुळेच आपल्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त असा प्रतिसाद जनतेतून मिळत असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी बोलताना सांगितले. लोणी गणातील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected