NAVI MUMBAI | ट्रक चालकांच्या आंदोलनाला मराठी कामगार सेनेचा जाहीर पाठिंबा
केंद्र सरकारने पारित केलेल्या वाहन कायद्याविरोधात ट्रक ड्रायव्हर थेट आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. केंद्राने केलेल्या या कायद्यात बदल पुन्हा दुरूस्ती करा, याकरता देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारत अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत. केंद्र सरकारच्या ह्या निर्णयावर ट्रक चालकांचे असं म्हणणे आहे की, अनेकदा चूक नसतानाही पळून जावे लागते कारण अपघातानंतर जमलेल्या जमावाकडून मारहाणीची भीती असते. त्यामुळेच वाहतूकदारांची ही भावना लक्षात घेता सरकारने यामधून योग्य तो मार्ग काढला पाहिजे शिवाय वाहतूकदारांच्या मनातील भीती कायमस्वरूपी दूर केली पाहिजे.वाहतूकदारांच्या अनेक समस्या आहेत आरटीओ मधील अडचणी, रस्त्यावरील अडचणी, तसेच ओव्हरलोड वाहतूक, व्यवसायामध्ये सातत्याने होत असलेले नुकसान याकडे देखील शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी मराठी कामगार सेना अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या ह्या निर्णयावर लवकरात लवकर तोडगा नाही निघाला तर येणाऱ्या काळात ओला उबेरचे ड्रायव्हर देखील ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतील, तसेच कायद्याच्या तरतुदी मध्ये जेव्हा बदल केला जाईल तेव्हाच हा संप मागे घेतला जाईल असे मराठी कामगार सेना अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले आहे.
stay connected