झोपडीत राहणार्या गोसावी समाजाला शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी...गणेश पांडुळे.
कडा/प्रतिनिधी.
आष्टी तालुक्यातील कडा येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या गोसावी समाजाला शासनाने यांना जागा उपलब्ध करून द्यावी.
औरंगाबाद जिल्ह्यामधून हा गोसावी समाज कडा येथे वीस ते पंचवीस वर्षापासून झोपडी बांधून स्थायिक झाले आहेत.
ह्या गोसावी समाज आपली उपजीविका भागवण्यासाठी लांब लांब गावा गावात खेड्या खेड्यात पायी फिरत असतात त्या गावांमध्ये जाण्यासाठी कसल्याही वाहनाची सोय नाही तरी हा समाज आपली उपजीविका भागवण्यासाठी सकाळी 5 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कामधंद्यासाठी भटकत असतो जी काही मजुरी मिळते त्या मजुरीतून खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते तरी जे उरलेले अन्नधान्य आहे ते आपल्या झोपडी मध्ये ठेवतात हा गोसावी समाज सकाळच्या वेळी कामधंद्यासाठी बाहेरगावी गेल्यावर मागे गावातील जनावरे, कुत्री व दारू पिऊन चोरी करणारे हे फिरत असतात.
त्यामुळे त्यांच्या घराला दरवाजा नसल्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे संकटे येत आहेत.
तसेच गोसावी समाजाला काळामध्ये शासनाने स्वस्त धान्य दुकानातून माल देण्यात यावा तरी गणेश पांडुळे यांनी तहसीलदार साहेबांना बातमीच्या माध्यमातून विनंती केली आहे की या गोसावी समाजाला जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावी व तसेच स्वस्त धान्याची ही सोय करण्यात यावी अशी मागणी गणेश पांडुळे यांनी केली आहे.
stay connected