वेलतूरी गावात अनुदान वाटपात अफरा तफर
वेलतुरी / प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील वेलतूरी सज्यातील २०२२/ २३ खरीप व रब्बी हंगामातील सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असता त्यावेळी मंत्री मोहदय मा.धनंजय मुंढे साहेब, कृषी आयुक्त श्री चव्हाण साहेब, जिल्हाधिकारी साहेब,तालुक्यातील लोकप्रतिनिधी श्री बाळासाहेब आजबे काका, श्री सुरेश आण्णा धस आदींनी या भागातील शेतकऱ्यांच्या अतोनात झालेल्या नुकसानीची पाहणी करून स्थानिक अधिकारी वर्गांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.
जनता आणि सरकार यांच्यामधला महत्वाचा घटक हा तलाठी असतो, वेलतूरी सज्यातील तलाठी संजय दगडखैरे यांनी अनुदान याद्या मध्ये अफरा तफर केल्याची तक्रार गावकऱ्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता त्यांची दखल घेऊन मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी चौकशी समीती वेलतूरी गावात येऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घ्यातल्या.तलाठी संजय दगडखैरे यांनी गावातील दोन चार गावगुंडांना हाताशी धरून व तलाठ्याबरोबर असनारा झिरो रायटर्स यांच्याकडून एका जागी बसून अनुदान याद्या तयार करून घेतल्या.निव्वळ काही गोर गरीब शेतकऱ्यांनी लाच न दिल्याने त्यांना अनुदानापासून वंचित ठेवले.ईतकेच नव्हे तर भारत मातेच्या रक्षणासाठी शहिद झालेले सुरेश सोनवणे यांच्या वीर मातेकडून ऑनलाइनच्या नावाखाली बावीसशे रुपये घेऊन त्यांच्या सहा सात कुटूंबातील खातेदारांना अनुदानापासून वंचित ठेवले हे पाप सांगत असताना त्या वीर मातेच्या डोळ्यात अश्रु दाटून आले. .तर ज्या खातेदार शेतकऱ्यांने लाच स्वरूपात पैसा जास्त दिला त्याला जास्त अनुदान देण्यात आले इतकेच नव्हे तर ज्यांना क्षेत्रफळ कमी त्यांना अनुदान जास्त व ज्या शेतकऱ्यांना फळबागा नाहीत किंवा काहींच्या जमीनी पडीक आहेत असा शेतकऱ्यांचे नावे अनुदान यादीत घेतली आहे. ज्यांच्या फळबागांचे नुकसान झालेले असताना त्यांना जाणून बुजून अनुदानापासून वंचित ठेवले.ईतर गावांनी अनुदान वाटप ४० ते ५० % टक्या पर्यंत केले आहे वेलतूरी गावात मात्र २९ % टक्याप्रमाणे करून पाच सहा लाख रुपये शिल्लक ठेऊन गोर गरीब शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवून देण्याचं काम केले. आत्तापर्यंतची पार्श्वभूमी पाहिली असता ज्या ज्या ठिकाणी कर्तृत्ववर असताना त्या त्या ठिकाणी अशी कुटाणे केलेली आहेत.असा अनेक तक्रारी खातेदार शेतकऱ्यांनी चौकशी समीती समोर केल्या.अशा भ्रष्टाचारी लाचखोर व्यक्तीला निलंबित करावे नसता आम्ही अमरण उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र घोडके, ऋषिकेश गायकवाड, शौकत पठाण,किशोर गव्हाणे,सागर गायकवाड, आबासाहेब गव्हाणे, विनोद सोनवणे, नवनाथ गव्हाणे, भगवान गायकवाड,अजीनाथ गव्हाणे,बापू गव्हाणे, गहिनीनाथ गव्हाणे,सचीन गव्हाणे, डॉ.संभाजी गव्हाणे, पोस्टमन बाळासाहेब गव्हाणे,मुख्तार शेख, अमोल गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे,अंबादास बोरकर, साईनाथ गव्हाणे, प्रवीण गव्हाणे, भाऊराव गव्हाणे,दत्तात्रय बोरकर, प्रेमचंद सोनवणे, प्रदीप सोनवणे, कैलास जाधव, लक्ष्मण दिवटे, अर्जुन दिवटे, योगेश दिवटे, प्रशांत गायकवाड आदी ग्रामस्थांसह महीला उपस्थित होत्या.
stay connected