केस शिल्पी महामंडळाच्या घोषणेनंतर नाभिक समाजाने मानले सरकारचे आभार..
मंत्र्यांना पेढा भरवून साजरा केला आनंद....!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.१३ मुंबई : नाभिक समाजाच्या विकासासाठी
इतर समाजा प्रमाणे अर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी समाजातील सर्वच संघटना,महामंडळ आणि राष्ट्रीय जनसेवा पक्ष सरकारकडे वारंवार मागणी करीत होते.
याच मागणीचा एक भाग म्हणून राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या शिष्ट मंडळाने नोव्हेंबर महिन्यात राज्याचे बहुजन समाज विकास मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन केस शिल्पी महामंडळाची मागणी केली होती.
मा.मंत्र्यांनीही या मागणीचा गांभीर्याने विचार करून लागलीच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या बाबत शिफारस करण्याचे आश्वासन जनसेवा पक्षाच्या शिष्ट मंडळाला दिले होते.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत सेनाजी केससिल्पि महामंडळाची घोषणा करून ५० कोटी निधीची तरतूद केल्याने राज्यातील नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर नाभिक समाजाच्या लढ्याला यश आल्याने समाजातून आनंदाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.विविध संघटनांकडून आणि समाज कार्यकर्त्यांकडून शिंदे फडणवीस सरकारला धन्यवाद दिले जात आहेत.
महत्वाची बाब म्हणजे सरकारने या महामंडळाला श्री संत सेनाजी महाराजांचे नाव दिल्याने समाजाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
याच आनंदाचा भाग म्हणून आज राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या शिष्ट मंडळाने राज्याचे सहकार तथा बहुजन विकास मंत्री अतुलजी सावे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान सकल नाभिक समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे व राज्य सरकारचे आभार मानण्यात आले.
या वेळी पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित यांनी मंत्र्यांपुढे नाभिक समाजाची आणि सलून व्यवसायाची गंभीर परिस्थिती आणि केस सिल्पी बोर्डाची आवश्यकता यावर सविस्तर चर्चा केली आणि सरकारने यापुढेही समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी असेच सहकार्य करण्याची विनंती केली.
मानताना मंत्री महोदयांना पेढा भरवून त्यांना श्री संत सेनाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
या प्रसंगी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महावीरजी गाडेकर,उपाध्यक्ष संजय पंडित,संपर्क प्रमुख गजानन राऊत,जेष्ठ प्रदेश सल्लागार शेखर काका भोर,तुकाराम काका सोनवणे,अनिल जगताप,वीर भाई कोतवाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर,खजिनदार लक्ष्मण पवार आदी समाज कार्यकर्ते उपस्थित होते.
हा आनंद साजरा करीत असताना राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे अध्यक्ष महावीरजी गाडेकर यांनी समाजातील नाभिक महामंडळाच्या सर्व गटांना, संघटनांना आणि समाज कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले असून समाजाची महत्वाची मागणी पूर्णत्वास जात असल्याबद्दल सर्वांचे यावेळी आभार मानले असून यापुढेही अशाच प्रकारे समाजहितासाठी सामाजिक ऐक्य राखण्याचे आवाहन केले आहे.
stay connected