राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येतील आरोपींना कडक शासन व्हावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील पत्रकारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..

 राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येतील आरोपींना कडक शासन व्हावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील पत्रकारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख यांच्यासह बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक १०फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मा. जिल्हाधिकारी साहेबांना  निवेदन देण्यात आले आहे...







याविषयी सविस्तर माहिती अशी की,

 राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या, परळी येथील पत्रकार अभिमन्यू फड यांच्या सह राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध व आरोपीस कडक शासन व्हावे अशी मागणी बीड येथील मराठी पत्रकार परिषदेकडून करण्यात आली .

 सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणार्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारावर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे. महानगर टाइम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते

यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत बारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे.. शशिकांतने विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच कार बारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रैक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषद ने  मागणी केली आसुन चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील केज बसस्थानकात परळी कडे जाणाऱ्या बस मध्ये परळी येथील सुदर्शन न्यूज चॅनलचे पत्रकार फड यांच्यावर काही समाज कंटकानी हल्ला करून त्यांच्या विरोधातच केज पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांच्यावरच दबाव तंत्राचा वापर करण्यात आला या घटनेचाही आम्ही तीव्र निषेध करत असुन त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करत आहोत. राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना या आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत राज्यात गेल्या आठ


दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत.. हत्या झालेले पत्रकार शशिकात वारिशे कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे. तसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी आमची विनंती आहे.. असे जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी व सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.