कोल्हापुरी बंधारे हे शेतकऱ्यांना वरदान ठरणार - माजी सभापती अशोक इथापे
दौलावडगाव ( शेख कासम ) - आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे माजी राज्यमंत्री आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या अंतर्गत केळ - दौलावडगाव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे जलपूजन नुकतेच माजी सभापती अशोक दादा इथापे यांच्या हस्ते संपन्न झाले.
भौगोलिकदृष्ट्या सदैव पर्जन्यछायेखाली असलेल्या, दुष्काळाच्या झळा झेलत तुलनेने अल्प पाऊस पडत असल्याने, व पडलेल्या पावसाचे पाणी पुरेशा प्रमाणात मृदु व जलसंधारणाची कामे रखडल्याने अडवल्या जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्रास दुष्काळाचा सामना करावा लागतो. किंबहुना एक किंवा दोन पाण्यावाचून शेतकऱ्यांचे पिके वाया जातात. यातून शेतकऱ्यांना कायम चिंता दूर करण्याचा मनी ध्यास बाळगत, माजी मंत्री आमदार सुरेश धस आष्टी तालुका तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलम सुफलम करण्यासाठी, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या माध्यमातून कोल्हापुरी पद्धतीचे एकूण ३८ कोल्हापुरी बंधारे मंजूर करुन आणले होते. त्यापैकी दौलावडगाव येथे दोन कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्याचे नुकतेच काम माजी सभापती अशोक इथापे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले असून, त्यांच्याच हस्ते रविवार दि. ८ जानेवारी रोजी जलपूजन संपन्न झाले. कोल्हापुरी बंधारे हे शेतकऱ्यांना वरदान करणार असल्याचे मत अशोक इथापे यांनी यावेळी व्यक्त केले.
या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता उच्च असून, याला २ मीटर उंचीचे ८ गेट बसवण्यात आले आहेत. याचा फायदा लघु सिंचन पाणीसाठ्यात वाढ होऊन एकूण ५० ते १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षेत्र ओलिताखाली येण्याची आशा आहे. या बंधाऱ्यामुळे मुळेवाडी इथापेवस्ती, आमराई आदी परिसरातील आजूबाजूला क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी मुरलीधर फसले, अंकुश गव्हाणे,भरत इथापे, महादेव थोरात, भास्कर मुळे गोटीराम कोहक,किरण फसले,भरत थोरात, प्रवीण वाणी, सतिश कोहक, सुभाष कोहक,किरण घोडे,दत्ता फसले,आयुब खान,राजू लबडे,धोंडीभाऊ इथापे,नंदू इथापे,हौसराव इथापे,पत्रकार शेख कासम ,अर्जून थोरात यांच्या सह बहूसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected