प्रत्येकाचे आयुष्यच असते कविता डाॅ.मधुसूदन घाणेकर
आम्रपाली धेंडे
पुणे:5 जानेवारी 2023: " प्रत्येकाच्याच आयुष्यात सुख दुःखाचे
चढउतार असतात..सुखावणा-या आठवणी असतात..जगण्याची उमेद
वाढवणारी स्वप्नंही असतात.या सर्व
अनुभुतिंचे तरल शब्दांकन म्हणजे
असते कविता..प्रत्येकाने आपल्या
सृजनशील.क्षमतेनुसार स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहिल्यास तिथे
नक्की मिळतील कविता...
सुचेल ते लिहा..लिहिलेला एकही शब्द वाया जात नाही..त्यावर सतत
चिंतनमनन करत रहा..नक्कीच सकस
काव्यनिर्मिती घडेल ! "
असे प्रतिपादन पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष, विश्व विख्यात कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
स्वराज्य लेखणी मंच संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन विशेष काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते, सदर
काव्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात
डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते.याप्रसंगी डाॅ.घाणेकर यांनी त्यांच्या काही ग्रामीण कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.आघाडीची युवा कवयित्री राजश्री मराठे वाणी यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांची ओळख करुन दिली.
त्यांनी स्वागत आणि ईशस्तवनाचीही
जबाबदारी सांभाळली.सुनीता कपाळे, औरंगाबाद
यांनी प्रास्ताविक केले.प्रिती काकडे
यांनी सूत्रसंचालन केले.
या बहारदार सोहळ्यास सचिन मुळे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.स्वराज्य लेखणी मंचचे संस्थापक
प्रकाश फर्डे यांनी आभार प्रदर्शन केले. वर्षभरात अनेक नवोदित आणि
मान्यवर कवी कवयित्रींनी स्वराज्य
लेखणी मंचचे व्यासपीठ गाजवले.
प्रथम वर्धापन दिनाचा सोहळा
सर्व निमंत्रित कवी
कवयित्रींनी प्रगल्भ आशयघन कविता
सादर करुन तरल..हळुवार मैफिल
रंगवली, याबद्दल डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सर्वांचे अभिनंदन करुन
संस्थेच्या झंजावती वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही दिल्या.
stay connected