सजग ,सशक्त व सुदृढ समाज निर्माण करण्याचे कार्य पत्रकारितेतुन व्हावे - संपादक बबलुभाई सय्यद

 

सजग ,सशक्त व सुदृढ समाज निर्माण करण्याचे कार्य पत्रकारितेतुन व्हावे - संपादक बबलुभाई सय्यद






धानोरा (प्रतिनिधी ) -

 पत्रकार,वार्ताहर हे समाज मनाचा आरसा आहे. समाज परिवर्तना बरोबरच सामाजिक बांधिलकेतून चांगल्या वाईत घटनांचे वास्तव चित्रण आपल्या लेखनीतून समाजा समोर मांडताना वेळेचे भान व कर्तव्याची जाण ठेवून उपेक्षितांना आधार देत  मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य पत्रकार करतात . जन हितासाठी सरकारच्या चुकीच्या धोरणांना बेनकाब करतात ! पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ! मात्र हा स्तंभ भ्रष्ट वाळवीने पोखरला असुन जनतेची विश्वासाहर्ता गमावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .  काही प्रसार माध्यमे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेली आहेत म्हणुनच समाजात प्रथमतःच गोदी मिडीया , पाकिट पत्रकारीता असे शब्दप्रयोग प्रचलीत होऊ लागले . मेन स्ट्रिम मिडीयातील काहींनी आपली विश्वासार्हता गमावली असुन केवळ राज्याश्रयाच्या जोरावर समाजात तेढ निर्माण करणारी दुकानदारी जोरात चालु असल्याचे स्पष्ट जाणवते . पत्रकारिता हा धंदा नाही तर धर्म आहे याचे भान ठेवले पाहिजे. अनेक प्रामाणिक पत्रकार आजही सत्य समोर मांडताना दिसतात परंतु त्यांची ताकद कमी पडत आहे . सत्य व प्रामाणिक पत्रकारांना राज्याश्रय नाही मिळाला तरी चालेल मात्र जनतेचा आश्रय व पाठींबा मिळाला पाहिजे . तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा चौथा स्तंभ टिकेल .सजग ,सशक्त व सुदृढ समाज निर्माण करण्याचे कार्य पत्रकारितेतुन होणे गरजेचे असल्याचे मत तेजवार्ता न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक बबलुभाई सय्यद यांनी व्यक्त केले . धानोरा येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते . या प्रसंगी शेतकरी नेते शिवाजीराव सुरवसे , पोलीस नाईक दादासाहेब उदावंत , तेजवार्ता चे उपसंपादक संदीप जाधव , महादेव वामन , पत्रकार अनिल मोरे , कॅमेरामन शेख हमजान , कैलास शेळके , विलास उदावंत , जॉन्टी , सय्यद आसिफ , सय्यद आतिक आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी तेजवार्ता चे उपसंपादक महादेव वामन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला उपस्थितांनी महादेव वामन यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या .

यावेळी बोलताना पत्रकार संदीप जाधव म्हणाले की पत्रकारांनी सामाजिक जबाबदारी चे भान ठेऊन सकारात्मक पत्रकारीता करावी . आपली स्वच्छ प्रतीमा जपत निर्भयपणे निष्पक्ष व सच्ची पत्रकारीता करत  उपेक्षीत घटकांना न्याय द्यावा . ग्रामीण पत्रकारीता आजही आपली विश्वासार्हता टिकवुन आहे मात्र मेन स्ट्रिम मिडीयाची इमेज जनतेच्या नजरेत दूषीत झाली असल्याचे चित्र पहावयास मिळते . पत्रकारांनी ईमानदारीने काम करावे अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.