रेशन दुकानदाराला आता काटा मारता येणार नाही...? केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी.....!!

 रेशन दुकानदाराला आता काटा मारता येणार नाही...?

केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी.....!!




प्रतिनिधी : संजय पंडित



दि.७ मुंबई : रेशन दुकानदारांना अशा गैर कृत्यांना चाप बसावा, गरीबांच्या पदरात त्यांच्या हक्काचे माप पडावे, यासाठी केंद्र सरकारने नवा नियम केला आहे.. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या गैर प्रकारांना आळा बसणार असल्याचे बोलले जाते…


नवा नियम काय..

केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, आता सर्व रेशन दुकानांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’च्या (ई-पाॅश) वस्तू इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याशी जोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर लोकांना कमी रेशन देता येणार नाही. तसा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास दुकानदार लगेच पकडले जातील व प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे हक्काचे रेशन मिळेल.


राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरजू लाेकांना देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य वाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक’ वजन काट्याला ‘ई-पाॅश’सोबत जोडण्याची योजना आखली आहे. त्यामुळे लोकांना योग्य प्रमाणात रेशन मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.