*युवकांनी आर्थिक नियोजन ,सामाजिक बांधिलकी आणी राजकीय सुशिक्षितता पाळली पाहिजे - डॉ.जितीन वंजारे*
आयुष्यात कोठेही कोणताही प्रसंग घडो त्यात समाजकारण ,राजकारण आणी अर्थकारण असतंच.या जीवन जगताना महत्वाच्या गोष्टी आहेत याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.या गोष्टी आपण कमी जास्त प्रमाणात ग्राह्य धरत असाल तर लक्षात असुद्या तुम्ही कुठेतरी चुकत आहात.आज आपण ह्या गोष्टी वेळीच लक्ष देऊन आपल् जीवन कस सुखकर करू शकतो ते पाहू.
आपल्या जीवनात आपण महत्वाच्या वळणावर येतो ते शिक्षण संपवून जॉब नौकरी लागून लग्न करून संसारात पडल्यावर आणी तेंव्हापासून जीवनाची खरी कसोटी चालू होते,हे होत असताना सतत आपल्याला सामाजिक ,आर्थिक आणी राजकीय बाबींकडे कटाक्ष ठेवायला पाहिजे आता आपण तिन्हीही गोष्टी विस्ताराणे पाहू.
आर्थिक नियोजन:- मित्रहो आपले शिक्षण बहुदा आपले पालकच करतात,त्यामुळे शिक्षण या गोष्टीकडे बहुदा आपल्याला जास्त काळजी करण्याची गरज नाहीत आपला स्वतःचा प्रवास चालू होतो लग्नानंतर आणी नेमक याच काळात आर्थिक नियोजन खूप महत्वाच असत.साधारणता तीस वर्ष्यानंतर आपल्याला स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागते त्यात वयोवृद्ध आईवडील ,पत्नी ,लहान भावंडे आणी स्वतःची मुलं यांच्या सर्वांच्या भविष्याचा मुख्य सूत्रधार आपणच असतो त्यामुळे आर्थिक नियोजन लावणे आपली प्राथमिकता असली पाहिजे.वयाच्या तीसी पर्यंत सामान्य कुटुंबातील व्यक्तीने आपल्या संपूर्ण गरजा स्वतःच्या उत्पन्नातून पूर्ण केल्या पाहिजेत ,भविष्य निर्वाह निधी जमवला पाहिजे,आयुर्विमा ,मुलांच्या शिक्षण यावर याच काळात आपण गुंतवणूक केली पाहिजे.वयाची 30 ते 40 वर्ष ही आर्थिक भरारी ची वर्ष असतात त्यात आपल्याला कमावून घेतल पाहिजे यात प्रामुख्याने घर गाडी आणी भविष्यातील आर्थिक नियोजन लावले पाहिजे.आपण काम, नौकरी करत असताना एक्सट्रा इन्कम शोधल पाहिजे ज्यातून आलेल्या आडीअडचनी सोडवता आल्या पाहिजेत.आपला व्यवसाय ,नौकरी किंवा इतर काम यातील इन्कम नुसार पुढची गुंतवणूकीची पाऊले उचलली पाहिजेत.जॉब किंवा नौकरी लागल्या पासून फिक्स वर्षाच्या टप्यात विशिष्ट काम पूर्ण केली पाहिजेत जसं की पहिल्या पाच वर्ष्यात घर नंतर तीन वर्षात गाडी आणी नंतर भविष्य निर्वाहसाठी गुंतवणूक केली पाहिजे.टार्गेट पकडून काम केल्यास योग्य फलित मिळते .
सामाजिक बांधिलकी :- माणूस हा समाजशील प्राणी असून माणसाने समाजाशी प्रामाणिक राहिले पाहिजे.समाजात आपले विशिष्ट स्थान निर्माण करायचे असेल तर सामान्य विचार सोडून आपल्याला वेगळा विचार, शिक्षण आणी तत्व वापरायला पाहिजेत.समाजात आपल्याला शुद्ध नीती ,उच्च आचरण आणी मदतीची भावना असली पाहिजे त्यामुळे समाजात माणसाची प्रत वाढते.पैसा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे पैसेवाला बनल पाहिजे पैसा चांगल्या मार्गाने कमवून जीवन सार्थक लावल पाहिजे.त्यातून समाजहित जपलं पाहिजे आपल्यामुळे दुसऱ्याच भलं झालं पाहिजे एकमेकांना सहाय्य करून जीवन जगल पाहिजे.समाजात जगताना सामाजिक हित जपलं पाहिजे,आपली संस्कृती ,आपला धर्म आपल्या चालीरीती ज्या चांगल्या आहेत त्या नक्कीच पाळल्या पाहिजेत.सन-उत्सव हे आनंद घेण्यासाठी असतात त्यांना साजर केल पाहिजे.
राजकीय सुशिक्षितता:- हल्ली राजकारणात युवा पिढी उतरते आहे ही चांगली बाब आहे पण त्यात घराणेशाही ची घाण पसरत आहे हे बंद व्हायला हवं ,राजकारण ह्या विषयाकडे उच्च सुशिक्षित लोकांनी जराही दुर्लक्ष करता कामा नये कारण यावर सर्व घटकांचा विकास अवलंबून असतो.वयक्तिक विकास पण राजकीय वातावरणावर बराच अवलंबून असतो कारण शासकीय योजना ,शेती विषयक योजना ,शैक्षणिक योजना आणी व्यावसायिक योजना यावर शासनाची मक्तेदारी असतें आणी ती राबवन याच राजकीय लोकांच्या हातात असत .उदाहरनार्थ घरकुल योजना,विहीर योजना शिंचन योजना,जनावरे पालन योजना अश्या योजना यामुळे तुमचा स्वतःचा विकास होऊ शकतो त्यामुळे राजकीय सुशिक्षितता असली पाहिजे त्याकडे दुर्लक्ष नाही झाले पाहिजे.अशा प्रकारे आजच्या युवकांनी वयाच्या योग्य वेळी आर्थिक नियोजन,जीवनभर सामाजिक बांधिलकी आणी प्रत्येक वेळी राजकीय सुशिक्षितता पाळली पाहिजे आणी आपला सर्वांगीण विकास करून घ्यायला पाहिजे असे विचार युवा अभ्यासक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
stay connected