खालील फोटोत कचऱ्यात आलेले सव्वा लाखाचे सोने परत करणारे वाजिद शेख आहेत!
हा आणि ही इमानदारी आजच्या काळात पाहायला मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकी पाहायला मिळणे.
अहमदनगर मनपाच्या कचरा गाडीवर चालक असणारे आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असणारे वाजिद शेख यांनी कुठलाही लोभीपणा न दाखवता आपल्या 'इमान' ला जागत ते सोनं परत केलं.
०९/०१/२०२२ रोजी नेहमी प्रमाणे मुकुंदनगर भागात घरोघरी जाऊन कचरा जमा केला नंतर गाडी खाली करताना एक डब्बी नजरेस पडली,ती उघडली असता त्यात सोन्याचे दागिने सापडले.
नंतर गाडीवरील हेल्पर काळू शिंदे यांच्या बरोबर चर्चा करून शोध घेतला असता ते दागिने डॉ.मोहम्मद आजम यांचे असल्याची खात्री झाली आणि वाजिद शेख यांनी ते दागिने त्यांना परत केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनपा आयुक्त आणि उपमहापौर श्री. गणेश भोसले यांनी वाजिद रफिक शेख यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
वाजिद शेख यांच्या प्रामाणिकपणाचा सर्वत्र गौरव होत आहे!
वाजिद शेख यांच्या इमानदारीला सलाम!
stay connected