जळगाव शाळेतील २१ वर्षांनी भेटले शाळकरी सवंगडी,स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

 जळगाव शाळेतील २१ वर्षांनी भेटले शाळकरी सवंगडी,स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा




आष्टी। प्रतिनिधी

तालुक्यातील जळगाव येथील जय भवानी विद्यालयाच्या एकाच बाकावर बसलेले व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सवंगडी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने २१ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. २००० मधील जय भवानी विदयालयांतील माजी विदयार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा दि रविवार १६ जानेवारी रोजी आष्टी येथील कृष्णा हॉटेल मध्ये संपन्न झाला. 

आष्टी तालुक्यातील जळगांव येथील जय भवानी विद्यालयातील माजी विद्यार्थी अजित डिसले,भाऊसाहेब घुले,महेश शिंदे,राजेंद्र भोसले,विनायक तावरे,कल्पना धोंडे,संजय अग्रवाल,वैष्णव झांजे,सचिन श्रीश्रीमाळ,कृष्णा ससाणे,बाळू पोकळे,महादेव जाधव,शारदा बनकर,खंडू पवार,यांचे विशेष प्रयत्नातुन शैक्षणिक वर्ष १९९९-२००० च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्याच्या निमंत्रणास मान देत तत्कालीन शिक्षक मुख्याध्यापक गदादे,शिक्षक औटे, शिक्षिका रासकर,बनसोडे,सोनवने,शिंदे उपस्थित होते.२००० मधील इयत्ता १० बॅचचे विद्यार्थी २१ वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथम शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी अजित डिसले,भाऊसाहेब घुले,महेश शिंदे,रविंद्र काकडे माजी विदयार्थ्यांनी तत्कालीन गमती जमती, सुख, दुःख, झालेल्या चुका, मिळालेले यश, मनात राहिलेले शल्य व्यक्त करत कायर्क्रमामध्ये रंगत आणली. वर्गामध्ये ज्ञानाचे धडे देणाऱे शिक्षकांनी मेळाव्यामध्ये मुलांना समाजामध्ये कसे वागावे याचे धडे दिले प्रास्ताविक महेश शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन वैष्णव झांजे यांनी केले तर आभार अजित डिसले यांनी मानले. २१ वर्षांनी भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप, फेसबुक, मोबाईल व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा संकल्प केला. गरजेनुसार शाळेस आवश्यक ती मदत करण्याचे विदयार्थांनी मत व्यक्त केले,यावेळी राजेंद्र भोसले,विनायक तावरे,संदीप साबळे,उषा भालेकर,महादेव जाधव,भरत जाधव,ज्ञानेश्वर घनवट,शारदा बनकर,आदी विद्यार्थी उपस्थित होते.शाळेची आठवण म्हणून प्रत्येकाला स्मृती चिन्ह देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.