येवती येथील पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या महिलांचा ग्रामपंयायतला घागर घेराव आंदोलन

 येवती येथील पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या



महिलांचा ग्रामपंयायतला घागर घेराव आंदोलन





सुनील शिरपुरे/ झरीजामणी



झरीजामणी तालुक्यातील येवती येथील महिलांनी पाण्यासाठी केला लिंगती ग्रामपंचायतला घागर घेराव. लिंगती गटग्रामपंचायत मधील येवती गावातील महिलांनी ग्रामपंचायतला घेराव करून सरपंचांना जाब विचारणा केली. येवतीत सध्या पाणी समस्येने लोकांचे अस्तित्व व्यापले आहे. पाण्याकरीता लोक दाही दिशा वणवण भटकत आहे. पाऊस येईपर्यंत पुढचे चार-पाच महिने त्यांची ही परवड अशीच सुरु राहणार आहे. अव्यवस्थापन यामुळे सामाजिक व आर्थिक समस्या उग्ररुप धारण करीत आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती यावर तातडीने विचारपूर्वक कृती करावी. नाहीतर अवस्था वाळवंटी होण्यास वेळ लागणार नाही. अशा अव्यवस्थापनामुळे येवती येथील महिलांनी पाण्याची समस्या घेऊन ग्रामपंचायतला घागर घेराव आंदोलन केले आहे. महिलांची मागणी अशी कि, सर्व नळ, हातपम्प दुरुस्थी करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी. अशी मागणी येवती येथील महिला करीत आहे. या आंदोलनात उज्वला कुळसंगे (ग्राम.सदस्य), संगीता मेश्राम (पो. पाटील ), प्रभा मंडाळे, सपना मेश्राम, संगीता गोंडे, संगीता मडावी, सविता गोंडे, लक्ष्मण आडे, पांडुरंग मेश्राम, संजय तोडसाम, जोत्स्ना तोडसाम आदी महिला व पुरुष उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.