, कवी प्रकाश लावंड यांच्या
" काडवान " या कविता संग्रहाचे
थाटात प्रकाशन.
करमाळा = दि. २२ आ़ॅगस्ट करमाळ्याचे प्रसिध्द कवी प्रकाश लावंड यांच्या काडवान या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आज अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक अ़ॅड. डॉ बाबुराव हिरडे होते.प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे, प्राचार्य नागेश माने,यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशजी करे पाटील,अ़ॅड.अजित विघ्ने,एपीआय. रोहित चौधरी,समीक्षा प्रकाशनचे प्रविण भाकरे यांच्यासह पत्रकार व साहित्यिक विवेक येवले, प्रा. प्रदीप मोहिते, प्रा.दत्तात्रय मस्कर, केमिस्ट असोशिएशनचे सचिन साखरे, कवी नानासाहेब लावंड, उपप्राचार्य यशवंतराव लावंड,परभणीचे प्रगतीशील बागायतदार मोरे साहेब, प्रा.किसन कांबळे, दु़धे गुरूजी,साहित्यिका
सौ.शगुफ्ता शेख,कवयित्री मंजिरी जोशी, पदमाळे क्लासेसच्या अ़ॅड सौ.अपर्णा पदमाळे,कवयित्री अर्चना माने, प्राची सरवदे,ऋतुजा वीर, शाकुर शेख ,कवी दादासाहेब पिसे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक श्रोते हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार नवनाथ खरात यांनी केले तर प्रस्ताविक कवी दीपक लांडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कवी खलील शेख ,तेजस धेंडे यशकल्याणी परिवाराच्या सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.
stay connected