१०वी आणि १२ वी उत्तीर्ण गुणवंतांचा.. रविवार दि.८ जून रोजी आ.सुरेश धस मित्रमंडळातर्फे होणार गौरव..

 १०वी आणि १२ वी उत्तीर्ण गुणवंतांचा.. रविवार दि.८ जून रोजी आ.सुरेश धस मित्रमंडळातर्फे होणार गौरव..



आष्टी (प्रतिनिधी )आष्टी तालुक्यातील..यावर्षीच्या १०वी आणि १२ वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा आ.सुरेश धस मित्र मंडळ यांचे वतीने गुणगौरव समारंभ रविवार दि.८ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कूल या ठिकाणी होणार आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकां तर्फे करण्यात आले आहे.. दरवर्षी इ.१० वी आणि १२ वी इयत्ता उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार आ.सुरेश धस मित्र मंडळाचे वतीने होत असतो त्याप्रमाणे यावर्षी देखील या गुणवंतांचा सत्कार करून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी उद्देशाने या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सर्व पालकांनी आणि संबंधित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन  करण्यात आले आहे

आ. सुरेश धस पुढे म्हणाले, बेरोजगारीच्या समस्येवर कौशल्य शिक्षण हाच उपाय असल्याचा प्रभावी संदेश दिला. त्यांनी युवकांना व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहनही यावेळी केले. शिवराज्याभिषेक दिन फक्त साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुण युवकांनी आपल्या अंगी उतरवावेत प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करावेत सार्वजनिक संपत्तीचे व पर्यावरणाचे रक्षण करावे शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली व प्रागतिक राज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली जी गनिमी कावा म्हणून ओळखले जाते


कार्यक्रमात कुमारी शिवकन्या सौंदनकर हिने आपल्या ऑन-जॉब ट्रेनिंगचा अनुभव शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री प्रबोधन निकाळजे यांनी सोशल मीडियापासून दूर राहून युवकांनी कौशल्य शिक्षणाकडे लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे यांनी शिवराज्याभिषेकाचा इतिहास सांगत त्याचा सण म्हणून महत्त्व विशद केले. त्यांच्या मनोगताच्या शेवटी त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.



कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी तंत्र प्रदर्शनाला भेट देत प्रशिक्षणार्थ्यानी तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटीआयचे प्राचार्य श्री गणेश हडतगुणे यांनी केले तर सूत्रसंचालन एम. जी. पवार सर यांनी प्रभावीपणे पार पाडले.


या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये नगराध्यक्ष जिया बेग नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष श्री रंगनाथ धोंडे, श्री अशोक जीबकाटे, अॅड. प्रबोधन निकाळजे, श्री अक्षय शिरस्वाल, श्री कैलास रेडेकर, श्री गणेश  शिंदे, श्री गौतम आजबे, 

श्री विनोद रोडे,श्री सुनिल सानप, श्री नितेश कर्डुले, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.