*शेतीच्या गुलामीतून बाहेर पडण्याचा शेतकऱ्यांनी स्वतः काढलेला मार्ग*
1) शेतकऱ्यांनी आपली मुले- मुली शेतीच्या बाहेर काढण्याचा मार्ग निवडला. 1990 पासून त्याला वेग आला.
2) मुलांना शिकवा, गावा बाहेर धाडा, शेतीतुन बाहेर काढा, असे त्यांनी कोण्या नेत्यांचे ऐकून केले नाही. ही चळवळ नेताविरहित होती, आजही ती तशीच आहे.
3) शेतकरी कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्नातून पैसा येऊ लागला. हळू हळू शेतीवर अवलंबुन असणाऱ्यांची संख्या घटत गेली.
4) शेतीबाह्य उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी शेती हा मुख्य व्यवसाय न राहता तो 'जोड धंदा' झाला.
5) थेट शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या किती असेल? मी काही गावांची माहिती घेतल तेंव्हा लक्षात आले की, ही संख्या 10 ते 15 टक्याच्या आसपास आहे. (हा आकडा राज्यस्तरावर अधिकृतपणे काढण्याची गरज आहे.)
6) शेतीला स्वतंत्र करण्यात शक्ती लावण्या ऐवजी शेतकऱ्यांनी स्वतः स्वतंत्र होण्याचा मार्ग स्वीकारला. आज त्याचा परिणाम दिसू लागला आहे.
7) यापुढे शेती 'व्यवसाय' म्हणून करायची असेल तर तिला स्वातंत्र्य द्यावेच लागेल. 1) सीलिंग 2) आवश्यक वस्तू 3) अधिग्रहण हे कायदे रद्द करावेच लागतील. ही परिस्थिती येत्या 15-20 वर्षात येईल, ती लवकर यावी यासाठी किसानपुत्र आंदोलनाची धडपड आहे.
8) जे चळवळींना जमले नाही, ते परिस्थितीच्या रेट्यातून आकाराला आले,
9) पाण्याचा गुणधर्म जसा उताराकडे जाण्याचा आहे तसेच माणसांचा विशेषतः सर्जकांचा (शेतकरी किंवा स्त्री) गुणधर्म स्वातंत्र्याकडे जाण्याचा आहे. जेंव्हा अडथळा पार करता येत नाही, तेंव्हा पाणी दुसरी वाट शोधून काढले तसेच शेतकऱ्यांनी आपली अपत्त्ये शेतीतून बाहेर काढण्याचा मार्ग स्वीकारला.
10) हे व्हायला देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे 100 वर्षे जावी लागतील. खुलीकरणानंतर 50 वर्षे वाट पहावी लागेल. या काळात लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या, हा दीर्घ यातनांचा काळ कधीच विसरता येणार नाही.
◆
stay connected