लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर पुन्हा जनतेसमोर जाणार.. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे प्रतिपादन
आष्टी (प्रतिनिधी)
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या निधनाच्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये अल्पमताने मी पराभूत झालो आणि त्यानंतर 20 19 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे मी गेली दहा वर्ष आष्टी विधानसभा मतदारसंघाचा आमदार नाही विधान परिषद मतदार संघाचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण असल्यामुळे विधान परिषद सदस्य या पदावर काम करण्याला मर्यादा येतात दैनंदिन जीवनावश्यक असलेली सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी अडचणी येतात परंतु माझ्या विधानसभा सदस्याच्या कार्यकाळातील मी केलेली विकास कामे आणि दैनंदिन जनतेच्या सुखदुःखात सामील असल्यामुळे माझ्या या विकास कामांच्या पाठबळावर मी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा जनतेसमोर जाणार आहे मागील दहा वर्षातील झालेल्या विकास कामांची आणि मी केलेल्या कामांचे जनतेने मूल्यांकन करावे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले मातकुळी येथील मातकुळी ते कर्हेवडगाव या 4 कोटी 56 लक्ष रुपये किमतीच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य अमर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा निर्यात संबंधीचा चुकीचा निर्णय चांगलाच नडल्याने महाराष्ट्रातील आठ ते दहा लोकसभेच्या जागा गमवाव्या लागल्या विरोधकांच्या फेक नरेटीव्ह मुळे जनतेमध्ये संभ्रम पसरला आणि भारतीय जनता पार्टीचे आणि मित्र पक्षांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे
आता केंद्र शासनाने निर्यात बंदीचे धोरण बदलले असून शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले असून कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे तसेच शेतमालाला हमीभावामध्ये चांगली वाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मात्र केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या चांगल्या कामांची चर्चा ग्रामीण भागामध्ये होत नाही खासगी मध्ये मात्र चांगलं चाललंय असं म्हणतात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला अत्यंत समाधानी असून संसारासाठी धडपडणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या या अर्थसहाय्यामुळे चांगली मदत होणार आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान सन्मान योजनेतील सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत शेतकऱ्यांबाबत यापूर्वीच्या कोणत्याही सरकारमध्ये अशा प्रकारचे अर्थसहाय्य मिळालेले नाही तसेच एक रुपयांमध्ये पीक विमा देखील कोणत्याही सरकारने यापूर्वी काढलेला नाही महाराष्ट्र शासनाने मोफत वीज बिल आणि सौर योजना कार्यान्वित केली आहे या सर्व अतिशय चांगल्या बाबींची चर्चा ग्रामीण भागामध्ये होत नाही त्यामध्ये आपण कुठे कमी पडतो आहोत याचा विचार ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि विरोधकांना ठोस उत्तर दिले पाहिजे असे सांगत ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये कोविडच्या नावाखाली सर्व यंत्रणा ठप्प होत्या त्या काळात कोणताही विकास झालेला नाही आणि त्या सरकारने काहीही जनतेसाठी केलेले नाही
1999 ते 2014 या कालावधीमध्ये मी आणि आमच्या कुटुंबीयांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील केलेली जनतेची सेवा जनतेने पाहिलेली आहे मतदारसंघातील रस्ता कामे, वीज उपकेंद्रे निर्मिती, शाळा खोल्यांची बांधकामे, जलजीवन योजनेअंतर्गत गावोगावी पिण्याच्या पाण्याचे योजना कार्यान्वित केल्यामुळे या विकास कामांच्या जोरावरच आपण आजही जनतेमध्ये आहोत आणि दैनंदिन सुखदुःखात सामील होत आहोत
मागील दहा वर्षातील विधानसभा सदस्य हे जनतेच्या सुखदुःखात सामील होत नाहीत आता विधानसभा निवडणूक आल्यामुळे त्यांनी आपले दौरे सुरू केले असून विकास कामे केले असल्याचे ते सांगत आहेत कोविड काळामध्ये आपण आणि आमचे कुटुंबीय रात्रंदिवस जनतेच्या आरोग्यासाठी कार्यरत होतो याचा जनतेला विसर पडणार नाही
गेली दहा वर्षे आपण विधानसभा सदस्य नाहीत मध्यंतरी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई साहेब मुंडे यांनी माझ्यावर जबाबदारी टाकून मला विधान परिषदेची उमेदवारी देऊन निवडून आणले विधानसभा सदस्य आणि विधानपरिषद यामध्ये विकास कामांसाठी निधीची कमतरता जाणवते कारण एक विधानसभा मतदारसंघ आणि तीन जिल्हयातील गावांमध्ये करावी लागणारी विकास कामे यामध्ये फार मोठा फरक आहे त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार नव्हतो तरीही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मी त्याची जाणीव न होऊ देता 24तास लोकांचे सेवेत काम करत असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने मागील दहा वर्षाच्या काळात झालेली कामे आणि मी विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य असताना आष्टी विधानसभा मतदारसंघातील केलेल्या कामांचे मूल्यमापन जनतेने करावे आणि जनतेनेच ठरवावे आज केवळ विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आलो आहे आपण सर्व मूल्यांकन करून जनता जनार्दनाचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आपण येणार आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले
stay connected