मराठा जातीच्या विकासाबरोबर बहुजन समाजातील छोट्या छोट्या जातींचे जगणे सुकर झाले पाहिजे हा मराठा सेवा संघाचा विचार आहे - शिवश्री गंगाधर बनबरे

 मराठा जातीच्या विकासाबरोबर बहुजन समाजातील छोट्या छोट्या जातींचे जगणे सुकर झाले पाहिजे हा मराठा सेवा संघाचा विचार आहे - शिवश्री गंगाधर बनबरे



       आष्टी - 

     आपला भारत देश वगळता जगात कुठेही जाती व्यवस्था नाही. आपल्या देशातील जाती मराठा समाजाने निर्माण केल्या नाहीत. एका विशिष्ट व्यवस्थेने देशातील जाती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांसह इतर सर्व जाती मागास राहिल्या. तेव्हा मराठा समाजाबरोबरच इतर छोट्या छोट्या जातींचा विकास घडवून आणणे हा मराठा सेवा संघाचा हेतू आहे. असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांनी आष्टी येथे केले. मराठा सेवा संघाच्या वतीने आष्टी येथील राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृहाच्या सभागृहामध्ये पदाधिकारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख प्रशिक्षक म्हणून ते बोलत होते.




     पुढे बोलताना बनबरे म्हणाले की, मराठा समाजाबद्दल व मराठा सेवा संघाबद्दल चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी एक विशिष्ट समाज पूर्ण वेळ पूर्वीपासून कार्यरत आहे. मराठा सेवा संघाबद्दल जनतेमध्ये चुकीचे समज पसरविण्याचे काम हा समाज करीत आहे. आजही शासन व प्रशासन एका विशिष्ट समाजाच्या अधिकारांमध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे. आणि म्हणूनच मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र झाला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या सरन्यायाधीश पदावर एकदाही मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. याचा अर्थ काय समजायचा? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

     पुढे ते म्हणाले की मराठा समाज आज मोठ्या चक्रव्यूहात सापडला आहे. गरिबीमुळे मराठा समाजातील युवकांचे विवाह रखडले आहेत. त्यामुळे एक पिढीच बरबाद होत आहे. 

      महाराष्ट्रातील कुठल्याही जातीच्या व्यक्तीला परराज्यामध्ये मराठी म्हणून संबोधले जाते. पूर्वीचा कुणबी आजचा मराठा आहे .त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन योग्य आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले .या प्रशिक्षणामध्ये बीड जिल्ह्यातून 70 पदाधिकारी सहभागी झाले होते. मराठा सेवा संघाचे ध्येयधोरणे यावेळी गंगाधर बनबरे यांनी  शिबिरार्थींना समजावून सांगितले.






        आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये इंजि.तानाजी जंजिरे म्हणाले की मराठा समाजाने संघटित राहून आपला विकास साधला पाहिजे .शिक्षण घेऊन संघर्ष केला पाहिजे व खऱ्या अर्थाने शासन व प्रशासनावर पकड मिळवली पाहिजे.

      या प्रशिक्षणामध्ये बीड जिल्ह्यातून महेंद्र मोरे, सुवर्णा गिरे, विजय दराडे,  ॲड. निर्मलाताई सोनवणे, लक्ष्मण रेडेकर, भास्करराव निंबाळकर, ऍड.सिताराम पोकळे, विद्या चव्हाण, वर्षा शिंदे, माधुरी तवले, संजीवनी टाळके, डॉ.दत्ता नरसाळे, आबासाहेब खिलारे, अनिता निंभोरे, पत्रकार  अविशांत कुमकर, बापू जगताप, बन्सीधर मोरे , मुकुंद लगड सर, अविनाश जगताप, सोपान केरळकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शशिकांत  कण्हेरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब मुटकुळे यांनी केले.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.