निष्क्रिय सरकार हतबल प्रशासन
निष्क्रिय सरकार हतबल प्रशासन न्याय व्यवस्थेवरील उडालेला जनतेचा विश्वास लाचार जनता झोपलेले समाजसेवक अशी अवस्था देशाची झाली आहे.देशाच्या अखंडतेला कोणाची नजर लागली कही कळत नाही. दररोज काही ना काही विपरीत घटना घडत आहेत.राजकारणी लोकांनी केलेला जातीवादीचा मुद्दा छोटी ठिणगी मोठा भडका बनत चालला आहे . सणा चे पवित्र संपत चालले आहे त्यातील श्रद्धा भावना आपुलकी माणुसकी संपत चालली आहे .प्रत्येक सण पूर्वी गुण्या गोविंदाने साजरे होत होते आता प्रत्येक सणाला गाल बोट लागत चालले आहे.धर्माच्या नावावर निघालेल्या मिरवणुकी वर कसल्याही प्रकारचे नियंत्रण नाही.राजरोसपणे हत्यारे घेऊन लोक धिंगाणा करतात .इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर खुले आम हल्ले होतात आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेतेय हे योग्य नाही . अशा घटनावर सरकार कडून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दाखवली जात नाही याचे आश्चर्य वाटते. अशा घटना होऊ नये सणाचे पवित्र राखले जावे गोर गरीबांना त्यांचे जीवन चांगले जगता यावे .देशातील प्रत्येक व्यक्ती निर्भिड पणे जगावी भाईचारा कायम राहिला पाहिजे .यासाठी सरकारने कठोर आणि मजबूत पाऊल उचलले पाहिजे. समाज सेवक शांतता कमिटी यांनी या मध्ये हिरारीने भाग घेतला पाहिजे.
महाराष्ट्राचा यू पी बिहार होत चालला आहे. शांततेत पार पडणाऱ्या धार्मिक निवडणुका ह्या हिंसक बनत चालल्या आहेत ही बाब अत्यंत दुःखद आहे. कोणीतरी समाजकंटक या गोष्टीला खतपाणी घालत आहे .कोणताही सण आला तर पूर्वी सर्व धर्मियांना आनंद होत असे एक दुसऱ्याला शुभेच्छा देणे एकत्रित पने सण साजरा करणे फार चांगले वातावरण होते .पण काही दिवसापासून बरच काही बदलत चालले आहे .ही अत्यंत चिंतेची बाब आहे .राजकारणी लोक आपली खुर्ची वाचविण्यासाठी काही मुद्दा उपस्थित करून जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे आणि याचा परिणाम देशाच्या तरुण पिढीवर होत चालला आहे .शिक्षण घेण्याचा वयात मुले जातीवादी राजकारणाला बळी पडत आहे पंधरा सोळा वयोगटातील मुले या भयानक वातावरणात आपले करिअर खराब करून घेत आहे .याचा त्रास त्यांच्या पालकांना अप्रत्यक्षरीत्या होत आहे हे या मुलांच्या लक्षात येत नाही .सरकारने वेळीच दखल नाही दिली तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही . जे कोणी या अशा घडविण्यास कारणीभूत आहे त्यांची निःपक्षपने चौकशी करून त्यांचेवर योग्य ती कठोर कारवाई करून कायद्याची आणि पोलीस प्रशासनाची दहशत निर्माण करणे गरजेचे आहे.
stay connected