*व्हायरल फ्लू, इन्फ्लूएन्झा, कॉमन फ्लू वाढन्याची कारणे,उपचार व घ्यावयाची काळजी-डॉ.जितीन वंजारे*
डॉक्टरांकडे गेल्यानंतर जादातर लहान मुलांना 'इन्फेक्शन' झालं असं डॉक्टर म्हणतात तर आज आपण नेमकं इन्फेक्शन म्हणजे काय इन्फेक्शन कोण कोणत्या प्रकारचे असतात व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय या विविध गोष्टींचा सखोल अभ्यास घेऊया. सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन होताना दिसत आहे. या व्हायरल इन्फेक्शन मध्ये इन्फ्लूएन्झा,कॉमन फ्लू, बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू इत्यादी चा समावेश असू शकतो.त्याच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर सर्रासपने होणारा अँटिबायोटिक्स चा वापर जो त्याचा उपाय नसून अपाय आहे,त्यामुळे शरीरात घातक परिणाम होतात त्याचाच आपण अभ्यास करू.
*इन्फेक्शन म्हणजे काय-* शरीराच्या बाह्य भगातून वातावरणात असणाऱ्या हजारो जीव जंतूनी घेतलेला प्रवेश आणि त्यामुळे त्यांची शरीरात वाढलेली संख्या यामुळे झालेली हानी व कमी झालेली रोग प्रतिकार शक्ती आणि यातून रोग तयार होणे यालाच इन्फेक्शन म्हणातात .थोडक्या आपल्या शरीरात सूक्ष्म जीव जंतूंचा झालेला प्रवेश म्हणजेच इन्फेक्शन (संक्रमण)होय.
*व्हायरल इन्फेक्शन वाढण्याची कारणे-* अकस्मात वातावरणातील बदल,घाण दुर्गंधी,अस्वच्छता,स्वतःच अस्वच्छ राहणीमान,धूळ,आणि मुख्य म्हणजे अती प्रमाणात घेतले जाणारे प्रतिजैविक. कोणत्याही रोगाच मुख्य कारण म्हणजे इन्फेक्शन होय ते सूक्ष्म जीव जंतूंचे असू शकते त्यात व्हायरस-विषाणू, बॅक्टेरिया- जीवाणू, फंगस- बुरशी, पॅरासाईट- परजीवी आसतात.यामुळे शरीरात झालेल्या बदलाला आजार म्हणतात. यात विषाणू मुळे झालेल्या रोगाला विषाणूजन्य रोग आणि जिवाणूंमुळे झालेल्या रोगाला जीवाणूजण्य रोग म्हणतात.सध्या वाढत असलेल्या विषाणूजन्य रोगविषयी आपण पाहणार आहोत ज्याला व्हायरल इन्फेक्शन असही म्हणतात.याचा कार्यकाळ सात दिवस ते तीन आठवडे असू शकतो याला खूप कमी औषधी उपलब्ध आहेत कारण विषाणू नेहमी रूप बदलतात त्यांना एकच पर्याय असतो लक्षणांवर उपचार करणे याला अँटिबायोटिक्स काहीच उपयोगी पडत नाहीत.दुसरं म्हणजे लसीकरण एव्हढाच उपाय.पण यामधे आजकाल स्वतःला डॉक्टर समजणाऱ्या रुग्णांनी 'सेल्फ प्रिस्क्रीप्शन' च्या नावाखाली सर्रास बट्याबोळ चालवला आहे.अपुऱ्या माहितीमुळे अती प्रमाणात घेतलेल्या प्रतिजैवकांमुळे,त्यांच्या डोसचे प्रमाण माहिती नसल्याने,ते किती दिवस किती प्रमाणात घ्यायचे याचे ज्ञान नसल्यामुळे प्रतिजैविकांचा शरीरात दूरगामी घातक परीणाम होत आहेत.याला आवर घालने गरजेचे आहे. प्रतिजैवकांच्या अती वापरामुळे शरीरात प्रतिरोध निर्माण होत आहे त्यामुळे एखादा दीर्घ आजार बरा होत नाही,शरीरात आवश्यक असणारी जीवजंतू मारले जातात त्यामुळे जीवघेणा जुलाब ,पोटदुखी ,अपचन ,आतड्याचे विकार होऊ शकतात त्यामुळे प्रतिजैविक घेतल्यावर प्री आणि प्रो बायोटिक घेणं आवश्यक आहे.आजकाल जो खोकला , गळा दुखणे, ताप,अंगदुखी,त्वचेवर पुरळ ही पण प्रतिजैविक जास्त वापरामुळे झालेले दुष्परीणाम असू शकतात त्यामुळे प्रतिजैविक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.काही रुग्णांना रिपोर्ट अगदी तंतोतंत चांगले येतात पण त्यांना त्रास तर सहन करावा लागत आहे याचही कारण मागे कधीतरी अती प्रमाणात गरज नसताना घेतलेली प्रतिजैवक हाच असू शकतो.मानसिक स्थिती खालावन, मूड चेंज होन,झोप न लागणं,विसरून जान,एकच गोष्ट बार बार विचारात आणण,स्वतःलाच बोलणं ,बडबड करणं हे पण प्रतिजैविकांचा अती वापरामुळे होऊ शकत लक्षात असू द्या त्यामुळे स्वतः डॉक्टर बनू नका स्वतः औषधी खाऊ नका.
*काय काळजी घेतली पाहिजे:-* स्वतःची स्वच्छता महत्वाची आहे,आहार महत्त्वाचा आहे .हिरव्या पालेभाज्या,फळे,सकस आहार,मोड आलेले कडधान्य,अंडी,आहारात असणे गरजेचे आहे .बेकरी आणि डेअरी प्रॉडक्ट जेवणात असली पाहिजेत त्यात पचनासाठी लागणारा लॅक्टिक आम्ल जीवाणू असतो जो पोटाचे आजार ,अपचन दूर करतो .जेवणांत दह्याच, ताकाच, दुधाच प्रमाण असल पाहिजे,कोथिंबीर,टोमॅटो, गाजर, मुळा,कोबी, अदरक,हळद इत्यादी चे जास्त प्रमाण असले पाहिजे . स्वतःचा परिसर स्वच्छ असला पाहिजे दुर्गंधी नसावी,घर हवेशिर असाव कोंदट वातावरण नसू नये,डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी प्रतिजैविक खाऊ नयेत,दिवसातून प्रत्येक वेळी साबणाने हाथ धुतले पाहिजेत ,सौचास गेल्यावर हाथ पाय साबणाने धुतले पाहिजेत,दोनदा अंघोळ केली पाहिजे ,अती थंड ,अती उष्ण,अती तिखट,अती गोड पदार्थ टाळावे ,बाहेर गर्दीत जाताना किंवा हॉस्पिटल परिसरात मास्क वापरावे.लहान मुलांना गर्दीत घेऊन जाऊ नये , होमीओपँथीक,आयुर्वेदिक,नैसर्गिक उपचार घेणे गरजेचे आहे.आहारात व्हिटॅमिन चा समतोल असावा .स्वतः आणि कुटुंबाची वैद्यकीय चाचणी दर सहा महिन्याला करून घेतली पाहिजे.त्यात रक्तातील साखर,चरबी,थायरॉईड,लिव्हर आणि किडनी कार्य तपासणी केली पाहिजेत.आणि मुख्य म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेतले पाहिजेत.आरोग्यविषयक सल्ला आणि अधिक माहितीसाठी *डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर, संजीवनी हॉस्पिटल-९९२२५४१०३०*
stay connected